शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सरकारी हेलिकॉप्टर्स खरोखरच सुरक्षित आहेत का? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 27, 2017 07:51 IST

लातूर हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षित राहण्याचं मनावर घेतले पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 -  लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात मुख्यमंत्री यांच्यासहीत हेलिकॉप्टरमधील 5 जण बचावले होते. यासंदर्भातच सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षित राहण्याचं मनावर घेतले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. शिवाय फडणवीस यांना  उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करीत आहोत, असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. 
 
एकीकडे मुख्यमंत्र्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत उद्धव यांनी दुसरीकडे सरकारी हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले आहेत. 
 
दरम्यान, ज्या दिवशी हा अपघात घडला होता तेव्हादेखील उद्धव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांची विचारपूस केली होती. 
 
काय आहे आजचे सामना संपादकीय?  
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भयंकर अशा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. त्यांचे नशीब बलवत्तर आहे व महाराष्ट्राच्या जनतेच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. निलंगा येथे त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. विजेच्या तारांना हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला आणि सुमारे ८० फुटांवरून खाली येत ते जमिनीवर कोसळले. उड्डाण घेऊन हेलिकॉप्टर काही उंचावर आल्यानंतर हवेचा दाब अचानक कमी झाला. एअर टर्ब्युलन्समुळे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने शिताफीने ते उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही हेलिकॉप्टर कोसळलेच. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही. मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी या अपघातातून सुखरूप बचावले हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्यावरचे एक संकट टाळल्याबद्दल आम्ही आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत आहोत. मुख्यमंत्र्यांना अखंड महाराष्ट्राची भरपूर सेवा करायची आहे व महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिपथावर न्यायचे आहे. त्यामुळे कोणतेही संकट व अडथळे त्यांना रोखू शकणार नाहीत हेच निलंग्याच्या दुर्घटनेवरून दिसते. 
 
‘‘मी ‘बाहुबली २’ की काय ते दाखवायला तयार आहे,’’ असे आव्हान फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी राजकीय विरोधकांना दिले होते. निलंग्याच्या अपघातानंतर फडणवीस हे स्वपक्षातील विरोधकांसाठी बाहुबली व इतर विरोधकांसाठी सुपरमॅन ठरले आहेत. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह दरवाजे उघडून पटापट खाली उड्या मारल्या. अर्थात मुख्यमंत्र्यांसारख्या ‘व्हीआयपी’चे जीवन दगदगीचे असते व सततच्या धावपळीसाठी ते सरकारी विमाने व हेलिकॉप्टरचा वापर करीत असतात, पण सरकारी हेलिकॉप्टर्स खरोखरच सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न निलंग्याच्या निमित्ताने उत्पन्न झाला आहे. दोन महिन्यांत हे हेलिकॉप्टर तिसऱ्यांदा बिघडले. यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही याच हेलिकॉप्टरने दगा दिला होता हे विसरता येत नाही. पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ाच्या दौऱ्यावर असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता व त्यांना त्या दुर्गम भागातून पुढे मोटारीने प्रवास करावा लागला होता. साताऱ्यात व नागपुरातही हेलिकॉप्टर बिघडले होते. त्यामुळे अशा प्रवासाच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. 
 
मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. त्या अति फिरण्याचा ताण सरकारी हेलिकॉप्टरवर आला असेल तर त्यांच्या जाण्या-येण्यासाठी पर्यायी व्यवस्था का होऊ नये? मुख्यमंत्र्यांना आज त्यांच्या पक्षात तसे कुणाचेच आव्हान दिसत नाही. त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेण्याचे ठरवले असले तरी ते इतरही अनेक भूमिकांत आहेत. ते सुपुत्र आहेत, पिता आहेत, पती व बंधू आहेत तसेच अनेकांचे मित्र आहेत. या नात्याने त्यांच्यावरील संकटाची काळजी सगळ्य़ांनाच वाटू शकते. मुख्यमंत्र्यांनी अधिक काम करण्यासाठी ‘फिट’ राहण्याचे मनावर घेतले आहे. आता ‘सुरक्षित’ राहण्याचेही मनावर घेतले पाहिजे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे आपल्या पूर्वजांनी का म्हटलेय ते त्यांनी समजून घेतले तर आम्हाला काय म्हणायचे आहे ते त्यांना समजेल. पंतप्रधान मोदींच्या सरकारला तीन वर्षे होत असल्याचा उत्सव देशभरात सुरू झाला असतानाच मुख्यमंत्र्यांच्या निलंगा अपघाताची बातमी आली. मुख्यमंत्री सुखरूप आहेत व राहतील. त्यामुळे मोदी उत्सवात त्यांना सहभागी होता येईल. श्री. फडणवीस यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करीत आहोत.