शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलला ७ वा वेतन आयोग?

By admin | Updated: November 11, 2015 02:54 IST

बिहार विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवामुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवामुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहेत. या अंमलबजावणीचे मुख्य कारण म्हणजे येत्या मे महिन्यात पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका. शिवाय वाढती महागाई आणि मोदी सरकारची धोरणे ही सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात आहेत, असे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेत्याने सांगितले. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहार विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित मोठा पराभव झाला. हा पराभव घेऊन पाच राज्यांत विधानसभा निवडणुका लढवायच्या म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊन चुचकारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तामिळनाडू, आसाम, पुडुचेरी, केरळ व पश्चिम बंगालमध्ये येत्या मेमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. कर्मचाऱ्यांच्या नेत्याने सांगितले की, ‘‘वाढत्या महागाईमुळे घरखर्च चालविणे अवघड झाल्याची सरकारी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. सातवा वेतन आयोग लागू करायच्या आधी ५० टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्यास सरकारचा विरोध असल्याचे केंद्रीय मंत्र्याने आम्हाला सांगितले आहे.’’विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांना निवडणुकीपूर्वी ‘खास पॅकेजेस’ या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतून दिली जाऊ शकतात. त्यासाठी २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात निधी बाजूला काढून ठेवावा लागेल. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनर्रचनेसाठी अशा आयोगाची स्थापना होते. हाच आयोग राज्ये काही बदल करून अमलात आणतात.या आयोगाने सरकारी कर्मचाऱ्याची ३३ वर्षांची सेवा झाल्यास किंवा तो ५८ वर्षांचा झाल्यास त्याच्या निवृत्तीची शिफारस केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात आल्यापासून कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हा आयोग लवकर लागू करून या बातम्या निराधार असल्याचे आम्हाला सिद्ध करायचे आहे, असे मंत्र्याने सांगितले.सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून अमलात आणायचा आहे. आयोगाने शिफारशींना अंतिम स्वरूप देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना, त्यांचा महासंघ, संरक्षण दलातील व नागरी सेवांतील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी आधीच चर्चा केलेली आहे.अर्थ मंत्रालयाने सातव्या आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आपल्या शिफारशी तयार केल्या आहेत. बदलांची घोषणा झालेली असून मंत्रालय त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करेल. तयारी करण्याची मुदत प्रारंभी आॅगस्ट २०१५ होती. नंतर ती वाढवून डिसेंबर करण्यात आली. न्यायमूर्ती ए. के. माथूर यांच्या नेतृत्वाखालील या आयोगाने शिफारशी तयार केल्या आहेत.जवळपास ४८ लाख सरकारी कर्मचारी असून ५५ लाख सेवानिवृत्त आहेत. या सगळ्यांना या शिफारशींचा लाभ होईल.शिफारशींनुसार भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांएवढे वेतन मिळेल. दर्जा (पॅरिटी) कमी करण्यासाठी पे बँडस् कमी केले जाणार आहेत. सध्या ३२ पे बँडस् असून ते आता १३ पर्यंत आणण्यात येतील.केंद्र सरकारचा वेतनावरील खर्च ९.५ टक्क्यांनी वाढून १,००,६१९ कोटी होईल.सेवेचा कालावधी ३३ वर्षे किंवा वयाची ५५ वर्षे एवढा करण्यात आला आहे.सातव्या आयोगामुळे मूळ वेतनात ३० ते ४० टक्क्यांच्या वाढीची शिफारस करण्यात आली आहे.