शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

By admin | Updated: March 15, 2017 03:55 IST

अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान, वाशिम जिल्ह्यातील श्रीसंत सखाराम महाराज देवस्थान या पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या आराखड्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी गोष्टींचा समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्यांद्री अतिथीगृहावर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ.बच्चू कडू, आ.अमित झनक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. नांदगाव) येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी ६.६९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यात भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, बहुउद्देशीय सभागृह/सत्संग भवन, श्री संत गुलाबराव महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराची सुधारणा व सुशोभिकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे क्र ॉक्रि टीकरण आदींचा समावेश आहे.श्रीसंत गुलाबराव महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील भक्तिधाम परिसराच्या विकासासाठी २४.९९ कोटी रु पयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक भवन उभारणी, सायन्स सेंटर बांधणे, आर्ट गॅलरी, विश्रामगृह, जंतरमंतरच्या धर्तीवर बाग तसेच गौशाळा यांचा समावेश आहे.तर अमरावतील जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये सिमेंटचे रस्ते व नाले, स्वच्छता गृह, थिम पार्क आदींचा समावेश आहे. प्रस्तावित थिम पार्कमध्ये सभागृह, बाग, पार्किंगची सोय, डायनिंग हॉल, बोटींगची सोय, बाजारतळ आदींचा समावेश आहे. तर वाशिम जिल्ह्यातील लोणी (ता. रिसोड) येथील श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी २० कोटींच्या आराखड्यात मंदिराकडे जाणारे रस्ते, पालखी मार्ग यांची कामे, रस्त्याच्या कडील गावातील गटारींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर वीजेची सोय, भक्त निवास, प्रसाद साहित्य विक्रीसाठी दुकानांची उभारणी आदी कामे तसेच गावातील इतर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)