शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

एमएमआर प्रदेशातही क्लस्टर योजना लागू करा- खा. डॉ. श्रीकांत शिंदे

By admin | Updated: July 7, 2017 19:41 IST

एमएमआर प्रदेशासाठी ही योजना लागू करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 7 - शहरातील धोकादायक नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शिवसेनेने गेल्या 15 वर्षांपासून दिलेल्या चिवट लढ्याअंती राज्य शासनाने गुरुवारी अंतिम अधिसूचना काढल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर प्रदेशासाठी ही योजना लागू करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पापांचे बळी जात असल्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास व्हावा आणि या इमारतींत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शिवसेना गेली 15 वर्षे चिवटपणे लढा देत होती. शिवसेनेचे तत्कालीन आमदार, जिल्हाप्रमुख आणि विद्यमान ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ठाण्यासाठी लागू व्हावी, यासाठी मोठा लढा उभारला होता. शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींसह अन्य पक्षीयांनीही वेळोवेळी या लढ्याला साथ दिली. अखेरीस योजनेतील सर्व अडथळे दूर होऊन गुरुवारी राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे या सुधारित योजनेनुसार धोकादायक इमारतीत राहाणाऱ्या रहिवाशांना 300 चौरस फुटांपर्यंत विनामूल्य घर मालकी हक्काने मिळणार आहे.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असून कल्याण-डोंबिवलीसह एमएमआर प्रदेशातही ही योजना लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे. एकट्या कल्याण-डोंबिवलीतच एक लाखाच्या आसपास रहिवासी धोकादायक इमारतीत राहात आहेत, याकडे खा. डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा(मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री)(आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री)

एमएमआर प्रदेशात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून वीजयंत्रणा आणि पाणीपुरवठा यंत्रणांच्या अद्ययावतीकरणाची कामेही प्रगतीपथावर आहेत. मेट्रो आणि जलवाहतुकीच्या रुपाने एमएमआर प्रदेशाला वाहतुकीचा सक्षम पर्यायही उपलब्ध होणार असल्यामुळे क्लस्टर योजनेचा भार या परिसरावर येणार नाही. त्यामुळे एमएमआर प्रदेशातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनाही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून तातडीने दिलासा देण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.