शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

प्रकाश गंगाधरे यांचा सुरक्षेसाठी अर्ज

By admin | Updated: October 19, 2016 02:00 IST

मुलुंड शिवसेना-भाजपा राडाप्रकरणानंतर भाजपा कार्यकर्ते धास्तावल्याचे काहीसे चित्र पूर्व उपनगरात निर्माण झाले

मनीषा म्हात्रे,

मुंबई- मुलुंड शिवसेना-भाजपा राडाप्रकरणानंतर भाजपा कार्यकर्ते धास्तावल्याचे काहीसे चित्र पूर्व उपनगरात निर्माण झाले आहे. सोमय्यांपाठोपाठ सुधार समिती अध्यक्ष आणि भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनीदेखील मुंबई पोलीस आयुक्तांकडे जिवास धोका असल्याची भीती वर्तवली आहे.पालिकेच्या रावण दहनावरून पेटलेल्या सेना-भाजपा राड्यानंतर पूर्व उपनगरातील चित्र पालटले आहे. दसऱ्याच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांवर हल्ला चढविला. त्यानंतर, झालेल्या राड्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले. सोमय्या यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अशात पोलिसांनी दबावापोटी पक्षपाती भूमिका घेत, फक्त सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरुवातीला पाच जणांना अटक केली. तेव्हा पोलिसांनी जामीनपात्र कलमांतर्गत ही कारवाई केली होती. त्यानंतर, सोमय्या यांच्यासह भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाने या कलमात ३२४ बरोबरच भादंवि ३२६ या कलमाची भर पडली. रातोरात सेनेच्या आणखीन ९ नेत्यांना गोड बोलून पोलिसांनी जाळ्यात ओढले. ३२६ कलमाची वाढ झाल्याने, मुलुंड न्यायालयाने अटक शिवसैनिकांचा जामीन फेटाळला. या वेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपाचा एकही कार्यकर्ता येथे फिरकलादेखील नाही. येथून त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. यामध्ये सेनेच्या उपविभाग अध्यक्षांसह शाखाप्रमुखांचा समावेश आहे. अद्याप त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. सेनेचे पदाधिकारी क्रॉस केससाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिवसेना कार्यकर्ते संतापले आहेत. अटक झालेले शिवसेनेचे पदाधिकारी बाहेर आल्यानंतर काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय अद्याप सेनेचे बडे नेते समोर आले नाहीत. त्यामुळे शांत राहून ते काहीतरी विचार करत असल्याची भीतीही भाजपा नेत्यांना सतावत आहे. सोमय्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानंतर त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली. सोमवारी सुधारसमिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनीदेखील पोलीस आयुक्तांना जिवास धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे. गेले दोन दिवस धमकीचे फोन येत आहेत. शिवाय काही मंडळी कार्यालयाबाहेर संशयास्पद फिरत असून मला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. >निवडणुकांसाठी गल्लोगल्ली फिरावे लागतेगंगाधरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांसह गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. या प्रकरणानंतर कोणीही आपल्यावर हल्ला चढवू शकते, अशी भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुलुंड सहायक पोलीस आयुक्तांना कळविले. त्यानंतर, आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी त्यांची भेट शक्य झाली नाही. त्यामुळे बुधवारी त्यांना लेखी पत्र देण्यात येणार आहे.