शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नितीन आगे प्रकरणात ८ दिवसांत अपील करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 10:23 IST

दलित तरुण नितीन आगे हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी येत्या ८ दिवसांत उच्च न्यायालयात अपील करावे, अन्यथा सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष भालचंद्र मुणगेकर यांनी दिला आहे.

मुंबई : दलित तरुण नितीन आगे हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी येत्या ८ दिवसांत उच्च न्यायालयात अपील करावे, अन्यथा सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष भालचंद्र मुणगेकर यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करत मुणगेकर यांनी सरकारवर आरोप केले. सरकारी वकिलांनी फिर्यादीची बाजू मांडण्यात केलेली डोळेझाक त्यांनी निकालपत्र वाचनातून उघड केली. शिवाय या प्रकरणात पुरावे नष्ट करणाºया अधिकाºयांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय राज्य सरकारच्या अपिलात मध्यस्थी करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.दरम्यान, मयत नितीन आगेनंतर त्याच्या भूमिहीन कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने केली आहे. नितीनच्या बहिणीला शासकीय नोकरी आणि कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधून देण्याची मागणीही समितीने केली आहे.नितीनचा खून झाला होता का?नितीनच्या खुनातील परिस्थितीजन्य पुराव्यांकडे न्यायालयात दुर्लक्ष करण्यातआले. नितीनच्या बहिणी आणि आईची साक्ष नोंदवताना ज्या मुलीवरून हे हत्याकांड झालेत्या मुलीला बगल देण्यातआली. त्यामुळे सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाल्याने नेमका नितीनचाखून झाला होता का, असाउद्विग्न सवाल नितीनचे वडीलराजू आगे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.मुख्यमंत्री शब्दकधी पाळणार?२३ नोव्हेंबरला नितीन आगे प्रकरणाचा निकाल लागला. त्यात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. त्यानंतर ४ डिसेंबरला नितीनचे वडील उपोषणाला बसणार असल्याचे कळताच खासदार अमर साबळे यांनी त्यांना पुण्याहून गाडीत बसवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नेले.त्या वेळी नितीनच्या प्रकरणात झालेल्या अन्यायाची कबुली देत उच्च न्यायालयात प्रखरतेने बाजू मांडण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.मात्र, या घोषणेला चार दिवस उलटल्यानंतरही उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही पावले उचलली नसल्याने मुख्यमंत्री शब्द पाळणार का, असा सवाल मुणगेकर यांनी उपस्थित केला आहे.