शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नवीन मतदारांच्या जागृतीसाठी ‘अ‍ॅप’

By admin | Updated: September 28, 2016 23:06 IST

सोशल मीडिया : ‘फेसबुक’च्या स्क्रीनवरही येणार संदेश

शोभना कांबळे -- रत्नागिरी --नव्या मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाकडून मोबाईल अ‍ॅप तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. यामुळे नव्या मतदारांमध्ये आपण मतदारयादीत नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. अजूनही मतदारांना मतदानाचे महत्व कळत नसल्याने निवडणुकीच्या वेळी मतदानाची आकडेवारी म्हणावी तशी वाढलेली नाही. त्यामुळे योग्य उमेदवार निवडून येण्यात अडचण येत आहे. मतदानाची आकडेवारी वाढण्यात नव्या मतदारांची नोंद मतदार यादीत होणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही त्यांच्यात याबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे आता नव्या मतदारांना मतदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे लवकरच मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आकाशवाणीवरील मुलाखतीत ही माहिती दिली. या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदाराचे नाव मतदार यादीत आहे का, असेल तर कुठल्या यादीत आदी माहिती मिळू शकणार आहे. त्यायोगे त्यात बदल करण्याची गरज असेल तर ती संबंधित तहसील कार्यालयात करता येऊ शकेल.तसेच फेसबुक, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाचा वापर नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवर ‘आपण मतदार यादीत नाव नोंदविले आहे का’ असा संदेश सुरूवातीलाच झळकणार आहे. त्यामुळे मतदाराला आपण नाव नोंदविणे गरजेचे आहे, याची जाणीव होईल. याचबरोबर महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामधूनही जागृती करण्यात येणार आहे. मतदारसंख्या वाढणार?मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांमुळे येत्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. फेसबुक, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाचा वापर नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवरही आता मतदारांच्या जागृतीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.