शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोकण वगळता महाराष्ट्र कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:18 IST

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून अद्यापही अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे सध्या राज्यात कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्र कोरडाच आहे. रविवारी कोकणात अनेक ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मात्र जोर कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून अद्यापही अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे सध्या राज्यात कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्र कोरडाच आहे. रविवारी कोकणात अनेक ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मात्र जोर कमी आहे.राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक भागात मागील महिनाभरापासून जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. पुढील काही दिवसही चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.रविवारी दिवसभरात राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल रत्नागिरी ७ मिमी, मालेगाव ६, अकोला ३, तर सातारा येथे २ मिमी पाऊस पडला. मुंबईत काही भागात तुरळक पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी असून अम्बोणे येथे ४०, कोयना ३० तर ताम्हिणी येथे २० मिमी पावसाची नोंद झाली.तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुढील तीन-चार दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ७ ते १० आॅगस्टदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई पावसाची विश्रांती असली तरी तुरळक ठिकाणी सरी कोसळत आहेत.गेल्या २४ तासांत मुंबई शहरात ०.१६, पूर्व उपनगरात १.५७ आणि पश्चिम उपनगरात १.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.