शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोकण वगळता महाराष्ट्र कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:18 IST

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून अद्यापही अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे सध्या राज्यात कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्र कोरडाच आहे. रविवारी कोकणात अनेक ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मात्र जोर कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून अद्यापही अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे सध्या राज्यात कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्र कोरडाच आहे. रविवारी कोकणात अनेक ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मात्र जोर कमी आहे.राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक भागात मागील महिनाभरापासून जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. पुढील काही दिवसही चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.रविवारी दिवसभरात राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल रत्नागिरी ७ मिमी, मालेगाव ६, अकोला ३, तर सातारा येथे २ मिमी पाऊस पडला. मुंबईत काही भागात तुरळक पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी असून अम्बोणे येथे ४०, कोयना ३० तर ताम्हिणी येथे २० मिमी पावसाची नोंद झाली.तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुढील तीन-चार दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ७ ते १० आॅगस्टदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई पावसाची विश्रांती असली तरी तुरळक ठिकाणी सरी कोसळत आहेत.गेल्या २४ तासांत मुंबई शहरात ०.१६, पूर्व उपनगरात १.५७ आणि पश्चिम उपनगरात १.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.