शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

गांधीविचारांसोबतच आचारांचाही अनुनय

By admin | Updated: January 30, 2015 00:57 IST

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारांनी गेल्या कित्येक दशकांपासून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. परंतु केवळ विचार आत्मसात केल्याने या महात्म्याची ओळख होत नाही. तर त्यांच्या

गांधी विचारधारा विभागाची प्रेरणावाट : विद्यार्थ्यांना मिळतेय संस्कारांचे संचित योगेश पांडे - नागपूरराष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारांनी गेल्या कित्येक दशकांपासून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. परंतु केवळ विचार आत्मसात केल्याने या महात्म्याची ओळख होत नाही. तर त्यांच्या संस्कारांचे खरे सामर्थ्य विचारांना आचारात आणल्यावर समजते. विचारांचेदेखील ‘मार्केटिंग’ करण्याच्या या युगात नागपूर विद्यापीठातील गांधी विचारधारा विभागात मात्र गांधींचे विचार प्रत्यक्ष आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसून येतो. ‘पॅकेज’च्या स्पर्धेतदेखील या संचित विचारांची शिदोरी विद्यार्थ्यांना या विभागापर्यंत खेचून आणते. सूतकताई, सर्वधर्मसमभाव प्रार्थना अन् समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गांधी विचारांची शिकवण देणारा हा राज्यातील एकमेव विभाग आहे हे विशेष.सूतकताई अन् ‘वैष्णव जन तो...‘चे सूरविभागातील वर्ग हे दररोजी सायंकाळच्या सुमारास भरतात. सायंकाळच्या वेळेस महात्मा गांधी सर्वधर्मसमभाव प्रार्थना आवर्जून म्हणायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या विभागात सायंकाळी ठीक ५.४५ वाजता ‘वैष्णव जन तो तेने कहिये...’ या बापूंच्या प्रिय भजनासोबतच सर्वधर्मसमभाव प्रार्थनेचे सूर उमटतात. या वेळी केवळ विद्यार्थी व शिक्षकच नव्हे तर परिसरातील नागरिकदेखील उपस्थित असतात. सूतकताई गांधी विचाराच्या प्रसारासाठी सुलभ माध्यम असल्याचे मानण्यात येते.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमादरम्यान प्रत्यक्ष सूतकताईदेखील करावी लागते. या उपक्रमासाठी विभागात सुमारे डझनभर अंबर चरखेदेखील आहेत.