शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

गांधीविचारांसोबतच आचारांचाही अनुनय

By admin | Updated: January 30, 2015 00:57 IST

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारांनी गेल्या कित्येक दशकांपासून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. परंतु केवळ विचार आत्मसात केल्याने या महात्म्याची ओळख होत नाही. तर त्यांच्या

गांधी विचारधारा विभागाची प्रेरणावाट : विद्यार्थ्यांना मिळतेय संस्कारांचे संचित योगेश पांडे - नागपूरराष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारांनी गेल्या कित्येक दशकांपासून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. परंतु केवळ विचार आत्मसात केल्याने या महात्म्याची ओळख होत नाही. तर त्यांच्या संस्कारांचे खरे सामर्थ्य विचारांना आचारात आणल्यावर समजते. विचारांचेदेखील ‘मार्केटिंग’ करण्याच्या या युगात नागपूर विद्यापीठातील गांधी विचारधारा विभागात मात्र गांधींचे विचार प्रत्यक्ष आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसून येतो. ‘पॅकेज’च्या स्पर्धेतदेखील या संचित विचारांची शिदोरी विद्यार्थ्यांना या विभागापर्यंत खेचून आणते. सूतकताई, सर्वधर्मसमभाव प्रार्थना अन् समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गांधी विचारांची शिकवण देणारा हा राज्यातील एकमेव विभाग आहे हे विशेष.सूतकताई अन् ‘वैष्णव जन तो...‘चे सूरविभागातील वर्ग हे दररोजी सायंकाळच्या सुमारास भरतात. सायंकाळच्या वेळेस महात्मा गांधी सर्वधर्मसमभाव प्रार्थना आवर्जून म्हणायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या विभागात सायंकाळी ठीक ५.४५ वाजता ‘वैष्णव जन तो तेने कहिये...’ या बापूंच्या प्रिय भजनासोबतच सर्वधर्मसमभाव प्रार्थनेचे सूर उमटतात. या वेळी केवळ विद्यार्थी व शिक्षकच नव्हे तर परिसरातील नागरिकदेखील उपस्थित असतात. सूतकताई गांधी विचाराच्या प्रसारासाठी सुलभ माध्यम असल्याचे मानण्यात येते.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमादरम्यान प्रत्यक्ष सूतकताईदेखील करावी लागते. या उपक्रमासाठी विभागात सुमारे डझनभर अंबर चरखेदेखील आहेत.