शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आणखी एक रेल्वे अपघात : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:01 IST

नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे आसनगावजवळ रेल्वे रूळावरून घसरल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले.

श्याम धुमाळ कसारा : नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे आसनगावजवळ रेल्वे रूळावरून घसरल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले.मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे निघालेली दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव रेल्वेस्थानकापुढे आली असता अचानक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने सर्व मातीचा ढिगारा व दगड रेल्वे ट्रॅकवर आला होता. तेवढ्यात दुरोंतो एक्स्प्रेस आली. समोर दरडी पडल्याचे लक्षात येताच दुरांतोचालकाने प्रसंगावधान साधून अचानक ब्रेक दाबला व गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता इंजिन रुळावरून घसरून विजेच्या खांबावर धडकले व पलटले. त्या पाठोपाठ गाडीचे बी-१, बी-२, बी-३, बी-४, बी-५, बी-६ हे डबेही घसरून पलटी झाले. अपघात इतका भयानक होता की, रेल्वेचे विजेचे पोल, ओव्हरहेड तारा रेल्वे ट्रॅकवर आडव्या झाल्या होत्या. एकीकडे पाऊस व दुसरीकडे दरडींचा ढिगाराा यामुळे मदतकार्यास विलंब होत होता. अपघात झाल्यानंतर रेल्वेची आसनगाव ते वासिंददरम्यानचा वीज पुरवठा बंद करून डब्यांमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.दरम्यान अपघातस्थळ जंगलात असल्यामुळे आपत्कालीन यंत्रणा पोहोचण्यास उशीर झाला. रेल्वे प्रशासनाने तसेच शहापूर तहसीलदार रवींंद्र बाविस्कार यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत घटनास्थळी आढावा घेतला.दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नागपूरहून मुंबईला उपचारासाठी निघालेले ६ रुग्ण होते. त्यात फ्रॅक्चरचे २ रुग्ण तर डायलेसीससाठी मुंबईकडे निघालेले ३ रुग्ण तर एक हार्ट पेशंट होते. या रुग्णांना शहापूर येथील आपत्ती व्यवस्थापन ग्रुपच्या सदस्यांनी खासगी रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविले. या रुग्णांपैकी नंदकिशोर मधुकर जिसकर (रा. अमरावती, भरतवाडी) यांना जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले तर गंगूबाई जोरदेवर (६०) रा. चंद्रपूर यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य ४ प्रवाशांना कल्याण येथे पाठविण्यात आले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.दुरुस्तीसाठी आलेल्या रेल्वे कर्मचाºयांना रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायरचे काम करताना अचानकपणे शॉक लागला. त्यात रामा राघो मेंगाळ, यशवंत भगत, मंगळू वारघडे, रामा वाघ, सखाराम मांगे, शिवराम ठाकरे हे जखमी झाले. या दरम्यान प्रवाशांचे हाल झाले. डोक्यावर बॅगा घेऊन जो-तो सुमारे २ किमी. पायपीट करीत महामार्ग गाठत होते. तेथून मिळेल त्या वाहनाने प्रवाशांनी कल्याण, ठाणे गाठले. अपघाताची माहिती मिळताच खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात