शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

बांधकामे नियमित करण्यासाठी दुसरे धोरण प्रगतिपथावर

By admin | Updated: June 9, 2016 06:06 IST

सरकारने तयार केलेल्या पहिल्या धोरणावर उच्च न्यायालयाने कठोर टीका केल्यानंतर आता दुसरे धोरण प्रगती पथावर आहे.

मुंबई : डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पहिल्या धोरणावर उच्च न्यायालयाने कठोर टीका केल्यानंतर आता दुसरे धोरण प्रगती पथावर आहे. हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच मंत्रिमंडळाकडून मंजूर करून घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात येईल, अशी माहिती सरकारने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.नवी मुंबईतील दिघा येथे विकासक , एमएमआरडीए, नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी भूखंड लाटण्यात आला व अनेक बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या. या सर्व बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.सरकारने केवळ दिघा येथील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याचा निर्णय न घेता राज्यभरातील सर्व डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्वच बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. तसे धोरणही तयार केले. मात्र हे धोरण अंतिम मंजूरीसाठी एप्रिलमध्ये उच्च न्यायालयापुढे सादर केले असता उच्च न्यायालयाने कडक टीका केली. राज्य सरकार नगर नियोजन प्राधिकरणांना महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन कायदा (एमआरटीपी), विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) आणि इमारतीपोट नियमांशी विसंगत कृत्य करायला लावत आहे. राज्य सरकारचे धोरण मनमानी आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ शी विसंगत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणाला परवानगीन देण्यास नकार दिला. परंतु, कायद्याच्या चौकटीत राहून नवे धोरण आखण्यास परवानगी दिली.मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सरकारचे नवे धोरण प्रगती पथावर असून लवकरच मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड. वग्यानी यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)