शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

बांधकामे नियमित करण्यासाठी दुसरे धोरण प्रगतिपथावर

By admin | Updated: June 9, 2016 06:06 IST

सरकारने तयार केलेल्या पहिल्या धोरणावर उच्च न्यायालयाने कठोर टीका केल्यानंतर आता दुसरे धोरण प्रगती पथावर आहे.

मुंबई : डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पहिल्या धोरणावर उच्च न्यायालयाने कठोर टीका केल्यानंतर आता दुसरे धोरण प्रगती पथावर आहे. हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच मंत्रिमंडळाकडून मंजूर करून घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात येईल, अशी माहिती सरकारने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.नवी मुंबईतील दिघा येथे विकासक , एमएमआरडीए, नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी भूखंड लाटण्यात आला व अनेक बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या. या सर्व बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.सरकारने केवळ दिघा येथील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याचा निर्णय न घेता राज्यभरातील सर्व डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्वच बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. तसे धोरणही तयार केले. मात्र हे धोरण अंतिम मंजूरीसाठी एप्रिलमध्ये उच्च न्यायालयापुढे सादर केले असता उच्च न्यायालयाने कडक टीका केली. राज्य सरकार नगर नियोजन प्राधिकरणांना महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन कायदा (एमआरटीपी), विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) आणि इमारतीपोट नियमांशी विसंगत कृत्य करायला लावत आहे. राज्य सरकारचे धोरण मनमानी आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ शी विसंगत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणाला परवानगीन देण्यास नकार दिला. परंतु, कायद्याच्या चौकटीत राहून नवे धोरण आखण्यास परवानगी दिली.मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सरकारचे नवे धोरण प्रगती पथावर असून लवकरच मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड. वग्यानी यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)