शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात दुसरे कृषी समृद्धी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:36 IST

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास

- नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. हे केंद्र कल्याण तालुक्यातील मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे, आंबिवली तर्फे वासुंद्री येथे उभारण्यात येणार आहे. याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.राज्यातील १० जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने या मार्गावरील प्रस्तावित २४ समृद्धी केंदे्र अर्थात, टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील कासगाव, सापगाव, शेलवली, खुटघर, फुगळे, वाशाळा, हिव आणि रास या गावांतील जमिनीवर कृषी समृद्धी केंद्र अर्थात, नवी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या महापालिकांसह नाशिक शहरापासून ही टाऊनशिप जवळ असल्याने, येथील जागांना सोन्याचे भाव आले आहेत.या भागात टाऊनशिप येणार असल्याचे आधीच माहीत असल्याने, मंत्रालयातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी येथे नातेवाईकांच्या नावे जमिनी विकत घेऊन ठेवल्याचा आरोप करून, शहापूर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, त्यांचा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी, नागपूरपाठोपाठ ठाणे शहरातही शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदीखतावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर, लगेच आता कल्याण तालुक्यात आणखी एक कृषी समृद्धी केंद्र प्रस्तावित केले आहे.प्रत्येकी ५०० हेक्टरची एक टाऊनशिपया संपूर्ण मार्गावर एकूण २४ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषी समृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे. त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शीतगृह, वखारींची साखळी आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर, टाऊनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळाने २४०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.