शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

ठाणे जिल्ह्यात दुसरे कृषी समृद्धी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:36 IST

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास

- नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. हे केंद्र कल्याण तालुक्यातील मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे, आंबिवली तर्फे वासुंद्री येथे उभारण्यात येणार आहे. याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.राज्यातील १० जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने या मार्गावरील प्रस्तावित २४ समृद्धी केंदे्र अर्थात, टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील कासगाव, सापगाव, शेलवली, खुटघर, फुगळे, वाशाळा, हिव आणि रास या गावांतील जमिनीवर कृषी समृद्धी केंद्र अर्थात, नवी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या महापालिकांसह नाशिक शहरापासून ही टाऊनशिप जवळ असल्याने, येथील जागांना सोन्याचे भाव आले आहेत.या भागात टाऊनशिप येणार असल्याचे आधीच माहीत असल्याने, मंत्रालयातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी येथे नातेवाईकांच्या नावे जमिनी विकत घेऊन ठेवल्याचा आरोप करून, शहापूर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, त्यांचा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी, नागपूरपाठोपाठ ठाणे शहरातही शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदीखतावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर, लगेच आता कल्याण तालुक्यात आणखी एक कृषी समृद्धी केंद्र प्रस्तावित केले आहे.प्रत्येकी ५०० हेक्टरची एक टाऊनशिपया संपूर्ण मार्गावर एकूण २४ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषी समृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे. त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शीतगृह, वखारींची साखळी आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर, टाऊनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळाने २४०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.