शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोकणासाठी आणखी ६० फेऱ्या

By admin | Updated: July 14, 2017 05:19 IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गणेश उत्सव काळात कोकण मार्गावर १४२ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा गणेश उत्सवात एकूण २०२ रेल्वेच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.पनवेल ते सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर नव्याने घोषित केलेल्या ६० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ०११८९-०११९० पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन १९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडीहून सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०११९१-०११९२ पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन २० आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१०४३-०१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (८ फेऱ्या) १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०१०४५-०१०४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (६ फेऱ्या) २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०११७९-०११८० मुंबई-चिपळूण स्पेशल ट्रेन (२२ फेऱ्या) २० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी पहाटे ५ वाजता सुटणार असून, चिपळूणला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटलेली ट्रेन मुंबईला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय पुणे- सावंतवाडीदरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई सेंट्रल, वांद्रे येथून सुटणार प.रे.च्या ट्रेनमध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेनेदेखील गणेशोत्सवासाठी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-मंगलोर, ट्रेन क्रमांक ०९००९ वांद्रे टर्मिनस-करमाळी एक्स्प्रेस, ०९००७ मुंबई सेंट्रल-मडगाव या विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. अहमदाबाद ते करमाळी या मार्गावर १० विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणपती विशेष एक्स्प्रेस-ट्रेनची बुकिंग १५ जुलैपासून सुरू होणार आहे.