शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोकणासाठी आणखी ६० फेऱ्या

By admin | Updated: July 14, 2017 05:19 IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गणेश उत्सव काळात कोकण मार्गावर १४२ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा गणेश उत्सवात एकूण २०२ रेल्वेच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.पनवेल ते सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर नव्याने घोषित केलेल्या ६० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ०११८९-०११९० पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन १९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडीहून सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०११९१-०११९२ पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन २० आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१०४३-०१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (८ फेऱ्या) १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०१०४५-०१०४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (६ फेऱ्या) २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०११७९-०११८० मुंबई-चिपळूण स्पेशल ट्रेन (२२ फेऱ्या) २० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी पहाटे ५ वाजता सुटणार असून, चिपळूणला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटलेली ट्रेन मुंबईला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय पुणे- सावंतवाडीदरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई सेंट्रल, वांद्रे येथून सुटणार प.रे.च्या ट्रेनमध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेनेदेखील गणेशोत्सवासाठी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-मंगलोर, ट्रेन क्रमांक ०९००९ वांद्रे टर्मिनस-करमाळी एक्स्प्रेस, ०९००७ मुंबई सेंट्रल-मडगाव या विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. अहमदाबाद ते करमाळी या मार्गावर १० विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणपती विशेष एक्स्प्रेस-ट्रेनची बुकिंग १५ जुलैपासून सुरू होणार आहे.