शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांचा पाऊस - कृतीचा दुष्काळ !

By admin | Updated: July 16, 2014 01:22 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकीकडे नागपूर शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण नागपुरात महापालिकेतील त्यांच्या शिलेदारांनी शहराची वाट लावली आहे.

मनपातील सत्ताधाऱ्यांचे ‘उल्लू बनाविंग’नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकीकडे नागपूर शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण नागपुरात महापालिकेतील त्यांच्या शिलेदारांनी शहराची वाट लावली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागपूरकरांना न पेलणारी आश्वासने दिली. विकासासाठी मोठमोठी स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात एकही स्वप्न पूर्णपणे वास्तवात साकारले नाही. मान्सूनच्या पावसासारख्या घोषणा होतात. ऊन वाढले की जलसाठ्यासारख्या घोषणाही आटतात. हा गेल्या अडीच वर्षांच्या महापालिकेतील सत्तेचा परिपाक आहे. चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. गडकरींनी तीन लाखांचे मताधिक्य मिळविले. त्यामुळे आता सहाही विधानसभेत ‘फिल गुड’ आहे अन् मदतीसाठी गडकरी आहेच, विकास कामे केली नाही तरी नागपूरकर गडकरींकडे पाहून मते देतील, असा समज इच्छुक उमेदवारांसह पक्षाने करून घेतला आहे. एकीकडे गडकरी व प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस देश व राज्य दुरुस्त करायला निघाले आहेत. पण येथे ‘होम टाऊन’मध्ये आपल्याच सत्ताधाऱ्यांवर वचक नाही. महापालिकेतील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करीत आहेत. अनेक प्रकल्पांच्या घोषणा झाल्या, मात्र त्या पूर्णत्वास आलेल्या नाही. विलंबासाठी पदाधिकारी प्रशासनाकडे बोट दाखवितात. पण प्रशसानावर पकड निर्माण करणे हे सत्ताधाऱ्यांचेच काम आहे. अशी कारणे देऊन ते स्वत:चे अपयश लपवून नागरिकांची दिशाभूल करू पाहात आहेत. नागपूरकर बोलत नाहीत, पण करून दाखवितात. आता पुरे झाले. ‘नो उल्लू बनाविंग’ असे नागपूरकर बोलू लागले आहेत. शहरात ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा सवाल करू लागले आहेत. (प्रतिनिधी)