शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

रेल्वेमंत्र्यांकडून अभ्यास समितीची घोषणा

By admin | Updated: August 14, 2016 21:33 IST

लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेवर पडणारा ताण आणि त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेवर पडणारा ताण आणि त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. लोकलवर येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी अभ्यासगट समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. सह्याद्री अतिथिगृह येथे रविवारी चिपळूण ते कराड रेल्वे मार्गाच्या कामासाठी कोकण रेल्वे व शापूरजी पालनजी कंपनीत सामंजस्य करार केला गेला. त्यावेळी प्रभू बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते व अन्य मंत्री तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रभू यापुढे म्हणाले की,मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज ८0 लाख प्रवासी प्रवास करत असून वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले नाही. रेल्वेवरील भार उचलण्यासाठी मेट्रोचे जाळे हे १५ ते २0 वर्षांपूर्वीच उभारण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे लोकलवरील येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यात कार्यालयीन वेळा बदलण्यात येणार असून त्यासाठी अभ्यास गटाची स्थापन करण्यात येईल. त्यांच्या अभ्यासानंतर पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. त्यासाठी खाजगी क्षेत्रानही मदत करावी, असे आवाहन केले. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाविषयी त्यांनी सांगितले की,या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील विकासाची दरी मिटणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास विकासाची गती वाढण्यास मदत मिळेल. रेल्वे मार्गाने बदंरणे जोडण्याबरोबरच विदर्भ-मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुंबईत एक लाख कोटींचे मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जागतिक बँकेची मदत घेताना रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट फंड उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रभू यांनी यावेळी दिली. सामंजस्य करारावर सह्याकोकण रेल्वे व शापूरजी पालनजी यांच्यात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या बांधणीसाठी परस्पर सामंजस्य करारावर सह्या झाल्या. यावेळी कोकण रेल्वे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. - प्रकल्पाची किंमत ३१९५.६0 कोटी- १0३ किमी प्रकल्पाची लांबी- ५८ पुल, १६ मोठे बोगदे, ८ किमीचा मोठा बोगदा- विहळे, मुंढे, कोयना रोड, पाठण, शेडगेवाडी आणि खोडाशी या सहा रेल्वे स्थानकांचाही समावेश. - सातारा ६६ किमी तर रत्नागिरीचा ३७ किमीच्या भागाशी संपर्क- प्रकल्पात वृक्षतोड टळणाररेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या दोन वर्षात लोकलची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा वारंवार केली. मात्र त्यावर ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांनी ही घोषणा केल्याने कार्यालयीन वेळेत बदल होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.