शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: फाईल चोरी प्रकरणी महाव्यवस्थापक नागेश जुंबाडे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:49 IST

गुन्हे तपास यंत्रणेने (सीआयडी) यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती.

मुंबई: दहिसर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण फाईल्स चोरी झाल्याप्रकरणी शुक्रवारी राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापक नागेश जुंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 28 तारखेला झालेल्या या चोरीनंतर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचाही खुलासा केला. गुन्हे तपास यंत्रणेने (सीआयडी) यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे या कार्यालयात अन्य फायली व संगणक वगळता फार काही नव्हते, असा दावा दिलीप कांबळे यांनी केला. सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत असून त्याच ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय होते. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले.

साठे महामंडळाच्या कार्यालयातून फायली लंपास करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या चेंबूर येथील कार्यालयास अस्मिता संस्थेकडून त्याच दिवशी देण्यात आली.फायली पळविणाऱ्यांमध्ये साठे महामंडळातील घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांचा भाऊदेखील होता, असे म्हटले आहे. आ. कदम या घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

इमारतीच्या तळमजल्यावर तीस वर्षे अस्मिता या सामाजिक संस्थेच्या वतीने मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग-चिकित्सा व पुनर्वसन केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या प्रमुख सुधा वाघ यांनी २८ एप्रिल रोजी घडलेल्या प्रकाराबाबत दहिसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. गुंड प्रवृत्तीचे चार-पाच जण इमारतीत आले. त्यांनी सील-कुलूप तोडून काही फायली, कागदपत्रे कारमध्ये भरणे सुरू केले. आमच्या केंद्राच्या कर्मचाºयांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दादागिरी केली. तोडलेल्या कुलपांच्या जागी नवीन कुलपे व त्यावर जुजबी सील लावून ते कारने निघून गेले, असे या तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ‘लोकमत’च्या हाती आले आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीRobberyदरोडा