शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अण्णा म्हणाले, केजरीवाल यांचे जीवन कलंकित

By admin | Updated: April 7, 2017 17:16 IST

सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला

आॅनलाइन लोकमतपारनेर (अहमदनगर), दि़ ७ - सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला ‘अण्णा माझे गुरू आहेत,’असे सांगत होते, हे माझ्या आता लक्षात आले आहे. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने व केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर शुंगलू समितीने गैरव्यवहारांचा ठपका ठेवला आहे़ यामुळे केजरीवाल अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर पत्रकाद्वारे कडक शब्दांत टीका केली. केजरीवाल यांच्यावर शुंगलू समितीने केलेल्या आरोपांमुळे मला अतिशय दु:ख झाले. मला वाटले होते, केजरीवाल यांच्यासारखे युवक समाजासाठी उभे राहिल्यास देशात चांगली कामे होतील, परंतु केजरीवाल यांनी माझे हे स्वप्नच भंग करून टाकले आहे. केजरीवाल यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला; तेव्हाच मला देवाने सुबुद्धी दिली होती, की तुम्ही पक्षात जाऊ नका. केजरीवाल यांच्याबरोबर तुमचीही बदनामी होईल, म्हणून मी कायम पक्ष व पार्ट्यांपासून दूर राहिलो आहे. देश कायद्याच्या आधारावर चालत आला आहे, तरी पण केजरीवाल कायदा मोडत आहेत, हे खूप दु:खदायक असून, यात मी अरविंद यांचे कधीही समर्थन करणार नाही़ उलट देश व समाजाला कमजोर बनवण्याच्या प्रयत्न केला म्हणून केजरीवाल यांचा मी निषेध करतो, असेही अण्णांनी पत्रकात म्हटले आहे. आम्ही आंदोलनात असताना अरविंद यांना सातत्याने शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवनात त्याग, अपमान पचविण्याची ताकद, निष्कलंक जीवन ही पाच तत्त्वे सांगत होतो, परंतु आता केजरीवाल यांच्यात शुद्ध आचार व शुद्ध विचार व त्याग यापैकी काहीच राहिले नसून, दागी जीवन बनले आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.