शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अण्णा म्हणाले, केजरीवाल यांचे जीवन कलंकित

By admin | Updated: April 7, 2017 17:16 IST

सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला

आॅनलाइन लोकमतपारनेर (अहमदनगर), दि़ ७ - सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला ‘अण्णा माझे गुरू आहेत,’असे सांगत होते, हे माझ्या आता लक्षात आले आहे. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने व केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर शुंगलू समितीने गैरव्यवहारांचा ठपका ठेवला आहे़ यामुळे केजरीवाल अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर पत्रकाद्वारे कडक शब्दांत टीका केली. केजरीवाल यांच्यावर शुंगलू समितीने केलेल्या आरोपांमुळे मला अतिशय दु:ख झाले. मला वाटले होते, केजरीवाल यांच्यासारखे युवक समाजासाठी उभे राहिल्यास देशात चांगली कामे होतील, परंतु केजरीवाल यांनी माझे हे स्वप्नच भंग करून टाकले आहे. केजरीवाल यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला; तेव्हाच मला देवाने सुबुद्धी दिली होती, की तुम्ही पक्षात जाऊ नका. केजरीवाल यांच्याबरोबर तुमचीही बदनामी होईल, म्हणून मी कायम पक्ष व पार्ट्यांपासून दूर राहिलो आहे. देश कायद्याच्या आधारावर चालत आला आहे, तरी पण केजरीवाल कायदा मोडत आहेत, हे खूप दु:खदायक असून, यात मी अरविंद यांचे कधीही समर्थन करणार नाही़ उलट देश व समाजाला कमजोर बनवण्याच्या प्रयत्न केला म्हणून केजरीवाल यांचा मी निषेध करतो, असेही अण्णांनी पत्रकात म्हटले आहे. आम्ही आंदोलनात असताना अरविंद यांना सातत्याने शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवनात त्याग, अपमान पचविण्याची ताकद, निष्कलंक जीवन ही पाच तत्त्वे सांगत होतो, परंतु आता केजरीवाल यांच्यात शुद्ध आचार व शुद्ध विचार व त्याग यापैकी काहीच राहिले नसून, दागी जीवन बनले आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.