शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:14 IST

Anna Hazare News: दिल्लीत आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Anna Hazare News: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७ टक्के मतदान झाले होते. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिहेरी लढत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले असून, ०८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकमेकांविरोधात प्रचंड टीका, आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. 

मीडियाशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला. सुरुवातीला अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे अण्णा हजारेंनी स्पष्टपणे सांगितले.

...तेव्हापासून मी त्याची साथ सोडली

राजकारण आणि पक्ष काढायच्या मागे लागला. अरविंद केजरीवाल यांनी पार्टी काढली, तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. मला समजले की हा स्वार्थी आहे. सुरुवातीला त्याचे आचार-विचार चांगले होते. तेव्हा राजकारण, पार्टी हे विषय त्याच्या डोक्यातही नव्हते. आता हेच दारूबाबत बोलत आहेत. दारूसाठी आम्ही आंदोलन केले होते, त्यावेळी अरविंद केजरीवाल आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत. त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे ते आले. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता, नंतर मला जेव्हा समजले तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीतील मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६९९ उमेदवारांच्या भवितव्याचा कौल मतदान यंत्रातून देण्यात आला. आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही दिल्लीत सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी आपल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे २५ वर्षांहून अधिक काळ दिल्लीतील सत्तेतून बाहेर असलेल्या भाजपाने यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसत आहे.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025