शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी; अण्णा हजारेंकडून तोंड भरून स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:29 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

अहमदनगरः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघे निष्कलंक असून, त्यांच्यावर कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोटाळ्यांची कोणतीही प्रकरणं माझ्याकडे पाच वर्षांत आलेली नाही. तसेच नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.मुख्यमंत्र्यांना फोन केल्यावर ते मला प्रतिसाद देतात, तसंच माझं ऐकतातही. केंद्रानं लोकपाल कायदा आणला असून, राज्यांनीही लोकायुक्त नियुक्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. माझ्याकडे केंद्र आणि राज्य सरकारविरोधात कोणतेही पुरावे नसल्यानं मी कोणाविरोधात आणि कशासाठी आंदोलन करू, असंही अण्णा हजारेंनी विचारलं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. शरद पवारांची काम करण्याची पद्धत पाहूनच राष्ट्रवादीतून अनेक नेते सोडून जात आहेत. साखर कारखाने आणि बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून, जसं करावं तसंच भरावं लागतं, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोक भाजपा घेत आहे. जनतेनं त्या भ्रष्ट लोकांचा निकाल लावाला, असं म्हणत अण्णा हजारेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे