शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी; अण्णा हजारेंकडून तोंड भरून स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:29 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

अहमदनगरः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघे निष्कलंक असून, त्यांच्यावर कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोटाळ्यांची कोणतीही प्रकरणं माझ्याकडे पाच वर्षांत आलेली नाही. तसेच नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.मुख्यमंत्र्यांना फोन केल्यावर ते मला प्रतिसाद देतात, तसंच माझं ऐकतातही. केंद्रानं लोकपाल कायदा आणला असून, राज्यांनीही लोकायुक्त नियुक्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. माझ्याकडे केंद्र आणि राज्य सरकारविरोधात कोणतेही पुरावे नसल्यानं मी कोणाविरोधात आणि कशासाठी आंदोलन करू, असंही अण्णा हजारेंनी विचारलं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. शरद पवारांची काम करण्याची पद्धत पाहूनच राष्ट्रवादीतून अनेक नेते सोडून जात आहेत. साखर कारखाने आणि बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून, जसं करावं तसंच भरावं लागतं, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोक भाजपा घेत आहे. जनतेनं त्या भ्रष्ट लोकांचा निकाल लावाला, असं म्हणत अण्णा हजारेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे