शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर भाजपात संताप

By admin | Updated: June 7, 2017 05:43 IST

शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपामध्ये प्रचंड संताप असून हिंमत असेल, तर सरकारमधून बाहेर पडा, असा सूर उमटू लागला

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारमध्ये राहून सरकारचीच अंत्ययात्रा काढायची आणि स्वत:च्या मुखपत्रातून फोटो छापून आणून शेतकऱ्यांचा खोटा कैवार घ्यायचा, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपामध्ये प्रचंड संताप असून हिंमत असेल, तर सरकारमधून बाहेर पडा, असा सूर उमटू लागला आहे.शेतकरी आंदोलनात आता शिवसेना सक्रिय झाली असून आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांची सभादेखील घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असेल तर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तसा प्रस्ताव आणावा. मंत्रिमंडळात शिवसेनेचे ऐकले जात नसेल तर ते डिसेंट नोटही देऊ शकतात. पण कोणतीही वैधानिक प्रक्रिया न करता सत्तेत राहून सरकारची बदनामी करायची, हे तर ज्या प्लेटमध्ये जेवण करतो तीच प्लेट फोडण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. जर मनासारखे होत नसेल तर त्यांनी सत्तेत कशाला राहायचे, असा सवालही या नेत्याने केला.भाजपाला शेतकऱ्यांचा हा प्रश्न नीट सोडवता येत नसेल तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे. त्यांचे कोणी हातपाय धरलेले नाहीत, असेही तो नेता म्हणाला. स्वत:च्या सरकारची पक्षाच्या मुखपत्रातून अशा प्रकारे टोकाची बदनामी करत असताना आपल्याही मंत्र्यांची बदनामी होत आहे याचे साधे भानही शिवसेना नेतृत्वाला उरलेले नाही, अशी टीकाही त्या नेत्याने केली.>राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन आंदोलनात जाऊ नका!शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हा, वातावरण तापत ठेवा पण पक्षाचे झेंडे, बॅनर घेऊन आंदोलनात जाऊ नका, अशा सूचना राष्ट्रवादीच्या सर्वाेच्च नेत्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीचे नेते विविध आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागलेले असताना आपण जर आंदोलनात गेलो तर शेतकरी पेटून उठला आणि शेतकऱ्यानेच सरकारच्या विरोधात बंड केले असे चित्र उभे राहणार नाही, म्हणून या सूचना दिल्या गेल्याचे समजते. काँग्रेसची अवस्था तर बिकटच आहे. आम्ही संघर्ष यात्रा काढली म्हणूनच सरकारने कर्जमाफी जाहीर केली, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असला तरी पक्षाने त्यात सक्रियपणे सहभागी व्हावे की नाही याविषयी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांना या आंदोलनात करायचे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. सहभागी नाही झालो तर मतदार शेतकरी नाराज होईल आणि पक्षाची झूल उतरवून गेलो तर कोणी विचारत नाही, अशी अवस्था या आंदोलनाबाबत दोन्ही काँग्रेसची झाली आहे.