शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर भाजपात संताप

By admin | Updated: June 7, 2017 05:43 IST

शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपामध्ये प्रचंड संताप असून हिंमत असेल, तर सरकारमधून बाहेर पडा, असा सूर उमटू लागला

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारमध्ये राहून सरकारचीच अंत्ययात्रा काढायची आणि स्वत:च्या मुखपत्रातून फोटो छापून आणून शेतकऱ्यांचा खोटा कैवार घ्यायचा, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपामध्ये प्रचंड संताप असून हिंमत असेल, तर सरकारमधून बाहेर पडा, असा सूर उमटू लागला आहे.शेतकरी आंदोलनात आता शिवसेना सक्रिय झाली असून आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांची सभादेखील घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असेल तर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तसा प्रस्ताव आणावा. मंत्रिमंडळात शिवसेनेचे ऐकले जात नसेल तर ते डिसेंट नोटही देऊ शकतात. पण कोणतीही वैधानिक प्रक्रिया न करता सत्तेत राहून सरकारची बदनामी करायची, हे तर ज्या प्लेटमध्ये जेवण करतो तीच प्लेट फोडण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. जर मनासारखे होत नसेल तर त्यांनी सत्तेत कशाला राहायचे, असा सवालही या नेत्याने केला.भाजपाला शेतकऱ्यांचा हा प्रश्न नीट सोडवता येत नसेल तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे. त्यांचे कोणी हातपाय धरलेले नाहीत, असेही तो नेता म्हणाला. स्वत:च्या सरकारची पक्षाच्या मुखपत्रातून अशा प्रकारे टोकाची बदनामी करत असताना आपल्याही मंत्र्यांची बदनामी होत आहे याचे साधे भानही शिवसेना नेतृत्वाला उरलेले नाही, अशी टीकाही त्या नेत्याने केली.>राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन आंदोलनात जाऊ नका!शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हा, वातावरण तापत ठेवा पण पक्षाचे झेंडे, बॅनर घेऊन आंदोलनात जाऊ नका, अशा सूचना राष्ट्रवादीच्या सर्वाेच्च नेत्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीचे नेते विविध आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागलेले असताना आपण जर आंदोलनात गेलो तर शेतकरी पेटून उठला आणि शेतकऱ्यानेच सरकारच्या विरोधात बंड केले असे चित्र उभे राहणार नाही, म्हणून या सूचना दिल्या गेल्याचे समजते. काँग्रेसची अवस्था तर बिकटच आहे. आम्ही संघर्ष यात्रा काढली म्हणूनच सरकारने कर्जमाफी जाहीर केली, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असला तरी पक्षाने त्यात सक्रियपणे सहभागी व्हावे की नाही याविषयी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांना या आंदोलनात करायचे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. सहभागी नाही झालो तर मतदार शेतकरी नाराज होईल आणि पक्षाची झूल उतरवून गेलो तर कोणी विचारत नाही, अशी अवस्था या आंदोलनाबाबत दोन्ही काँग्रेसची झाली आहे.