शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कर्करुग्णांचे ‘देवदूत’

By admin | Updated: May 1, 2017 05:25 IST

पांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी

स्नेहा मोरे / मुंबईपांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी नि:स्वार्थीपणे कर्करुग्णांच्या सेवेचे व्रत स्वीकारले आहे. सावला यांनी परळच्या भूमीत रुजविलेल्या ‘जीवनज्योती’ ट्रस्टचा वटवृक्ष झाला आहे.

जीवनज्योती’ ही संस्था सेंट जॉर्जेस, कामा, जे. जे आणि टाटा रुग्णालय येथे सुमारे ७००- ८०० रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देते. त्यात लहानग्या कर्करुग्णांनाही शाळेत जाऊन जेवण देण्यात येते. औषध बँक, सिक बेड सर्व्हिस, लहान मुलांसाठी टॉय बँक (खेळणी पुरवणे) आणि कृत्रिम अवयव बनवून देणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्करुग्णांचा आधारवड म्हणून महत्त्वाची भूमिका संस्था बजावत आहे. संस्था आता विस्तारली असून मुलूंड (मुंबई, ठाणे, जळगाव आणि कोलकाता येथेही संस्थेच्या शाखा आहेत.सावला यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. योग, व्यायाम इत्यादी नित्यक्रम आटोपल्यावर ते साडेआठ वाजता काम सुरू करतात. मग दिवसभरात जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवा करतात. सकाळी सुरु केलेले काम अविरतपणे रात्री १०.३० पर्यंत सुरु असते. कर्करुग्णांप्रमाणे ते रस्त्यावरील भिकाऱ्यांची देखभाल करतात. गरज भासल्यास त्यांना रुग्णालयातही दाखल करतात. सावला यांच्यासोबत त्यांची मुले चिंतन आणि नियासा जमेल तसा हातभार लावतात. शिवाय, त्यांच्या पत्नी निर्मला यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व कार्य शक्य झाल्याचे सावला अभिमानाने सांगतात. प्रायश्चित्तामधून सुरू झाला प्रवाससावला यांना एका मायलेकीने टाटा रुग्णालयाचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी पालिकेच्या शीव येथील पालिका रुग्णालयाचा पत्ता दिला. टाटा रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार केले जातात, हे त्यावेळी त्यांना कळले नाही. ‘टाटा’ रुग्णालयाविषयी माहिती नसल्याची सल त्यांच्यात तशीच राहिली. त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून कर्करुग्णांना मदत करण्याचा वसाच त्यांनी घेतला.मुक्या जिवांचीही काळजीसंस्थेतर्फे प्राणी-पक्ष्यांचीही काळजी घेतली जाते. मुंबईतील २६ जुलैच्या प्रलयानंतर वेगवेगळ््या ठिकाणांहून आणलेल्या ३ हजार जखमी कबुतरांची त्यांनी काळजी घेतली होती. त्यांना अन्न-पाणी देत त्यांचे प्राण वाचवले. जखमी, आजारी पशु-पक्ष्यांवर संस्थेतर्फे मोफत उपचार करण्यात येतात.१०२ वेळा रक्तदानसावला यांनी आतापर्यंत १०२ वेळा रक्तदान केले आहे. कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्वरित रक्तदान करण्याची त्यांची तयारी असते. त्यांना १०६ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांनी स्वत:ला झगमगाटापासून दूर ठेवले आहे. अंत्यसंस्काराचीही सेवारुग्ण दगावला, नातेवाईक निघून गेले किंवा मृताचे नातेवाईक नसतील तर ते अंत्यसंस्काराचे कामदेखील करतात. कर्करोगामुळे अपंग झालेल्या रुग्णांना आधारासाठी इतरांची गरज भासते. त्यासाठी ते कृत्रिम अवयवदेखील मिळवून देतात.पॉकेटमनीपासून सुरुवातस्वत:च्या पॉकेटमनीपासून त्यांनी हे कार्य सुरु केले. कामाचा व्याप वाढत होता तशी त्यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यांनी घराघरांतून जुने कपडे, भांडी, औषधे गोळा केली. जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या आणि रुग्णांना त्या थंडीच्या काळात दिल्या. वर्तमानपत्रांची रद्दी विकूनसुद्धा त्यांनी निधी गोळा झाला. त्यातून रुग्णांना पावसाळ््यात छत्र्या पुरविल्या. आता कार्याचा विस्तार झाल्याने समाजातील दानशूर व्यक्तीही सहभाग दर्शवित आर्थिक मदत करत असतात.