शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्करुग्णांचे ‘देवदूत’

By admin | Updated: May 1, 2017 05:25 IST

पांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी

स्नेहा मोरे / मुंबईपांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी नि:स्वार्थीपणे कर्करुग्णांच्या सेवेचे व्रत स्वीकारले आहे. सावला यांनी परळच्या भूमीत रुजविलेल्या ‘जीवनज्योती’ ट्रस्टचा वटवृक्ष झाला आहे.

जीवनज्योती’ ही संस्था सेंट जॉर्जेस, कामा, जे. जे आणि टाटा रुग्णालय येथे सुमारे ७००- ८०० रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देते. त्यात लहानग्या कर्करुग्णांनाही शाळेत जाऊन जेवण देण्यात येते. औषध बँक, सिक बेड सर्व्हिस, लहान मुलांसाठी टॉय बँक (खेळणी पुरवणे) आणि कृत्रिम अवयव बनवून देणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्करुग्णांचा आधारवड म्हणून महत्त्वाची भूमिका संस्था बजावत आहे. संस्था आता विस्तारली असून मुलूंड (मुंबई, ठाणे, जळगाव आणि कोलकाता येथेही संस्थेच्या शाखा आहेत.सावला यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. योग, व्यायाम इत्यादी नित्यक्रम आटोपल्यावर ते साडेआठ वाजता काम सुरू करतात. मग दिवसभरात जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवा करतात. सकाळी सुरु केलेले काम अविरतपणे रात्री १०.३० पर्यंत सुरु असते. कर्करुग्णांप्रमाणे ते रस्त्यावरील भिकाऱ्यांची देखभाल करतात. गरज भासल्यास त्यांना रुग्णालयातही दाखल करतात. सावला यांच्यासोबत त्यांची मुले चिंतन आणि नियासा जमेल तसा हातभार लावतात. शिवाय, त्यांच्या पत्नी निर्मला यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व कार्य शक्य झाल्याचे सावला अभिमानाने सांगतात. प्रायश्चित्तामधून सुरू झाला प्रवाससावला यांना एका मायलेकीने टाटा रुग्णालयाचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी पालिकेच्या शीव येथील पालिका रुग्णालयाचा पत्ता दिला. टाटा रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार केले जातात, हे त्यावेळी त्यांना कळले नाही. ‘टाटा’ रुग्णालयाविषयी माहिती नसल्याची सल त्यांच्यात तशीच राहिली. त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून कर्करुग्णांना मदत करण्याचा वसाच त्यांनी घेतला.मुक्या जिवांचीही काळजीसंस्थेतर्फे प्राणी-पक्ष्यांचीही काळजी घेतली जाते. मुंबईतील २६ जुलैच्या प्रलयानंतर वेगवेगळ््या ठिकाणांहून आणलेल्या ३ हजार जखमी कबुतरांची त्यांनी काळजी घेतली होती. त्यांना अन्न-पाणी देत त्यांचे प्राण वाचवले. जखमी, आजारी पशु-पक्ष्यांवर संस्थेतर्फे मोफत उपचार करण्यात येतात.१०२ वेळा रक्तदानसावला यांनी आतापर्यंत १०२ वेळा रक्तदान केले आहे. कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्वरित रक्तदान करण्याची त्यांची तयारी असते. त्यांना १०६ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांनी स्वत:ला झगमगाटापासून दूर ठेवले आहे. अंत्यसंस्काराचीही सेवारुग्ण दगावला, नातेवाईक निघून गेले किंवा मृताचे नातेवाईक नसतील तर ते अंत्यसंस्काराचे कामदेखील करतात. कर्करोगामुळे अपंग झालेल्या रुग्णांना आधारासाठी इतरांची गरज भासते. त्यासाठी ते कृत्रिम अवयवदेखील मिळवून देतात.पॉकेटमनीपासून सुरुवातस्वत:च्या पॉकेटमनीपासून त्यांनी हे कार्य सुरु केले. कामाचा व्याप वाढत होता तशी त्यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यांनी घराघरांतून जुने कपडे, भांडी, औषधे गोळा केली. जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या आणि रुग्णांना त्या थंडीच्या काळात दिल्या. वर्तमानपत्रांची रद्दी विकूनसुद्धा त्यांनी निधी गोळा झाला. त्यातून रुग्णांना पावसाळ््यात छत्र्या पुरविल्या. आता कार्याचा विस्तार झाल्याने समाजातील दानशूर व्यक्तीही सहभाग दर्शवित आर्थिक मदत करत असतात.