शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अंगणवाडीसेविकेची परभणीमध्ये आत्महत्या, पाच महिन्यांपासून नव्हता झाला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:21 IST

पाच महिने पगार न मिळाल्याने आर्थिक हलाखीत असलेल्या व सर्व नोंदी अद्ययावत करण्याच्या तणावातून अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.

परभणी : पाच महिने पगार न मिळाल्याने आर्थिक हलाखीत असलेल्या व सर्व नोंदी अद्ययावत करण्याच्या तणावातून अंगणवाडी सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली.पगार न झाल्याने पोट भरण्याची भ्रांत असताना बैठका कशा घ्यायच्या? त्याचा खर्च कोठून करायचा, असा सवाल सुमित्रा भगवानराव राखुंडे (५४) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. नांगणगाव येथील अंगणवाडीमध्ये २००१ पासून त्या मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. पंचायत राज समिती ८ नोव्हेंबरपासून परभणी जिल्हा दौºयावर येत आहे.त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. कागदपत्रे तयार करण्याच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.नांगणगाव अंगणवाडीमध्ये १०० रुपये मानधनापासून काम सुरू केले. आता एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून २००८ ते २०१७ या १० वर्षांचे रजिस्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, अंगणवाडी मंदिरात भरवित होते. त्यामुळे २००८ ते २०१२ चे रजिस्टर मंदिरातच ठेवले जात होते. ते गायब झाले आहेत. जून ते आॅक्टोबरचा पगार झाला नाही. दिवाळी तशीच गेली, असे चिठ्ठीत लिहिले आहे.