शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:09 IST

वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सातत्याने गृहोपयोगी वस्तूंच्या दराचा आलेख वाढत असल्याचा फटका सरकारी योजनांनाही बसत आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सातत्याने गृहोपयोगी वस्तूंच्या दराचा आलेख वाढत असल्याचा फटका सरकारी योजनांनाही बसत आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही त्यातीलच एक योजना आहे. ही योजना ज्या घटकांमुळे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवली जाते त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना २५० रुपये मानधन देण्यात येत होते. ते आता ५०० रुपये म्हणजेच त्यामध्ये दुपटीने वाढ केली आहे. १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू तसेच कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण वाढले होते. या गंभीर समस्येचे तातडीने निराकरण करणे क्रमप्राप्त होते. यासाठी सरकारने गरोदर स्त्रिया आणि स्तनदामाता यांना एक वेळचा परिपूर्ण आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना १८ नोव्हेंबर २०१५ रोजी सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी प्रतिदिन आहारासाठी सरासरी २५ रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता.आहाराचा सरासरी खर्च हा सदर योजना सुरु करताना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या तसेच त्या वेळच्या किमती विचारात घेऊन करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली. त्याचा विपरीत परिणाम गृहिणींचे बजेट कोसळण्यावर चांगलाच झाला असताना सरकारने केलेल्या दरवाढीचा फटका हा सरकारच्या विविध योजनांना चांगलाच बसला. त्यामुळे सरकारच्या विविध योजना अडचणीत येऊ लागल्या. दरवाढीचा फटका अमृत आहार योजनेलाही बसू लागला. त्यामुळे योजना कोलमडण्याआधीच तिला सावरणे गरजेचे होते. निधी अपुरा पडत असल्याची बाब क्षेत्रीय कार्यालयामार्फत सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली.योजना परिणामकारक पध्दतीने राबवता यावी यासाठी संबंधित जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अतिरिक्त निधी या योजनेसाठी खर्च करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.अमृत आहार योजनेची अंमलबजावणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामार्फत करण्यात येते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सदर योजनेंतर्गत गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना चौरस आहार शिजवून खाऊ घालणे त्याचप्रमाणे सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना उकडलेले अंडे आणि केळी हा आहार देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सदरची कामे त्यांच्याकडील राबवण्यात येणाºया अन्य योजनांव्यतिरिक्त आहेत. त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नियमित मिळणाºया मानधनाव्यतिरिक्त या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी २५० रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे समितीने सरकारला सांगितल्यानंतर मानधन ५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने २२ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.गरोदर स्त्री, स्तनदा माता यांना एक वेळच्या चौरस आहारासाठी प्रति लाभार्थी प्रतिदिन सरासरी खर्च २५ रुपये देण्यात येत होता आता तो ३५ रुपये करण्यात आला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी २५० रुपये मानधन देण्यात येत होते त्यामध्ये ५०० रुपये अशी दुपटीने वाढ करण्यात आली आहे.सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंडी, केळी देण्यासाठी पाच रुपये दर होता. तो आता सहा रुपये केला आहे.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकार या योजनेसाठी आधी २५० रुपये मानधन देत होते मात्र वाढत्या महागाईचा विचार करता तो ५०० रुपये केला आहे. परंतु महागाईकडे पाहता तो तुटपुंजा असल्याचा सूरअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यातून उमटत आहे.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेसात हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. सरकारच्या राष्ट्रहिताच्या सर्वच महत्त्वाच्या योजनांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ऊन, वारा, पाऊस यांची परवा करीत नाहीत. योजना लाभार्थ्यांपर्यंत सक्षमपणे पोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. त्यामुळे सरकारने सकारात्मक विचार करण्याची गरज आहे, असेही मत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे आहे.