शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आंध्र, गुजरातला कऱ्हाडच्या गुळाची गोडी!

By admin | Updated: October 27, 2015 00:22 IST

बाजार समितीत गुळाची आवक : सौद्यात परराज्यातील व्यापाऱ्यांची बोली; मागणी वाढल्याने उच्चांकी दराची अपेक्षा

कऱ्हाड : तालुक्यात खासगी तसेच सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांत दरवर्षी कोट्यवधी टन उसाचे गाळप होते. ‘साखरेचा पट्टा’ म्हणून कऱ्हाड तालुक्याची ओळख आहे. मात्र, साखरेसोबत आता कऱ्हाडच्या गुळाची गोडीही वाढली आहे. येथील बाजार समितीमार्फत कऱ्हाडचा गूळ परराज्यात पोहोचत असून, मागणी जास्त असल्याने गुळाला विक्रमी भावही मिळत आहे. उसाला चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी सध्या आंदोलनाची दिशा ठरवित कंबर कसली आहे. शेतकरीही चांगल्या दराच्या प्रतीक्षेत असून, गळीत हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कऱ्हाडच्या बाजार समितीतही गुळाची आवक सुरू झाली आहे. सौद्यांना प्रारंभ झाला आहे. गत काही वर्षांत उसाची कमतरता, ऊसदराच्या मागणीसाठी संघटनांचे आंदोलन व ऊसतोड कामगार थांबतील का जातील, अशा कात्रीत कारखानदारांबरोबरच शेतकरी ही अडकला आहे. मात्र, या परिस्थितीत गुळाला उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकरी गुऱ्हाळाकडे वळले असल्याचे चित्र आहे. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी गुऱ्हाळघराकडे ऊस पाठवित आहे. हंगामाला उशीर झाल्यास उसाचे वजन घटेल. तसेच गुळाचे पैसे एका महिन्यात एकरकमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांचा रस्ता धरला आहे. वास्तविक, कऱ्हाड तालुक्यात कृष्णा, सह्याद्री, जयवंत शुगर, रयत आदी कारखाने आहेत. या कारखान्यांवर दरवर्षीच्या हंगामात कोट्यवधी टन उसाचे गाळप होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्मितीही केली जाते.मात्र, साखरेबरोबरच कऱ्हाड तालुक्यात गुळाचे उत्पादनही मोठे आहे. ज्यापटीत ऊस कारखान्याला गळितासाठी घातला जातो त्याचपटीत हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस गुऱ्हाळगृहांवर गळीत केला जातो. त्यातून गूळनिर्मितीही मोठ्या प्रमाणावर होते. गुऱ्हाळ गृहांमध्ये तयार करण्यात आलेला गूळ कऱ्हाडच्या मार्केटमध्ये घालण्यात येतो. गुळाच्या मार्केटसाठी कऱ्हाड पूर्वीपासूनच परिचित आहे. येथील मार्केटमध्ये गुळाला चांगला भाव मिळतो. तसेच सौदेही लवकर होत असल्याने कऱ्हाडसह आसपासच्या तालुक्यातील शेतकरीही आपला गूळ विक्रीसाठी येथील मार्केटमध्ये आणतात. यावर्षीच्या गूळ सौद्यांना नुकताच प्रारंभ झाला आहे. येथील बाजार समितीमधून गूळ मुंबई व गुजरातच्या मार्केटला पुरविण्यात येतो. आठवड्यातून दोन दिवस गुळाचे सौदे होतात. या दोन दिवसांत आंध्रप्रदेश, गुजरात तसेच अन्य काही राज्यांतील व्यापारी कऱ्हाडचा गूळ खरेदी करतात. संबंधित राज्यांमध्ये येथील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा करताना गुळाला दरही चांगला मिळत आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी ४७ कोटी ४४ लाखांची उलाढालकऱ्हाड बाजार समितीत गतवर्षी गूळ सौद्याच्या माध्यमातून ४७ कोटी ४४ लाख एवढी प्रचंड उलाढाल झाली होती. आर्थिक वर्षातील उलाढालीचा हा आकडा प्रत्येक वर्षी वाढत असून, यावर्षीही यापेक्षा मोठी उलाढाल बाजार समितीला अपेक्षित आहे.विक्रमी ६ हजार ३०० दरबाजार समितीत गूळ सौद्याला दरवर्षी विक्रमी दर मिळतो. गतवर्षी येथे ६ हजार ३०० एवढा दर मिळाला होता. तर सरासरी दराचे प्रमाण २ हजार ८०० रुपये होते. यावर्षी ३ हजार २०० पासून सुरुवात गुळाच्या सौद्याला परराज्यातील व्यापारीही उपस्थित असतात. येथील शेतकऱ्याच्या गुळाला उच्चांकी दर मिळावा, यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत असते. मात्र, चांगल्या दरासाठी शेतकऱ्यांनीही दर्जेदार गूळ उत्पादनाबाबत काळजी घ्यावी. - बी. बी. निंबाळकर,प्रभारी सचिव, बाजार समिती