शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

...मग बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का - ओवेसी

By admin | Updated: September 8, 2015 16:46 IST

मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग आता बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ - पर्युषणादरम्यान मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचा निर्णय फेटाळून लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मुंबईत चार तर मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसासांठी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या निर्णयाविरोधात भाजपावर टीकेची झोड उठली असून शिवसेना, मनसे या पक्षांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. आता एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. मांसविक्रीवरील बंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले, धर्म एवढा महत्त्वाचा असेल तर बकरी ईददरम्याना मटण वाटले पाहिजे व भाजीविक्रीवर बंदी टाकायला हवी, हे तुम्हाला सहन होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असून अशा शहरात मांसविक्रीच्या व्यवसायावर बंदी घालणे योग्य नाही. हा फक्त मुस्लिमांचा विषय नसून याला आर्थिक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. मांसविक्रीवर अवलंबून असलेले कामगार या कालावधीत उदारनिर्वाह कसा करणार असा प्रश्न त्यांनी सत्ताधा-यांना विचारला. 
 
मांसबंदीमुळे ट्विटरवरही संताप
दरम्यान मीटबॅनच्या या निर्णयावर सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत असून ट्विटरवर तर  #meatban हा हॅशटॅग आज टॉप ट्रेंडिग विषय ठरला आहे. सामान्य जनतेसह सोनम कपूरसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही या बंदीविरोधात आवाज उठवत निषेध नोंदवला असून आहे. काही ट्विटरकरांनी तर मुंबईचा उल्लेख 'बॅनि'स्तान असा केला आहे असून काहींनी भाजप म्हणजे 'भारतीय जैन पार्टी' असल्याचे म्हटले आहे. 
 
'आपला देश अजूनही तिस-या जगातच वावरत आहे, मांसबंदीने आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडले आहे' अशी टीका अभिनेत्री सोनम कपूरने केली आहे. तर एका धर्माचे पावित्र्य जपण्यासाठी अन्य धर्मीय मांसाहार सोडत असतील तर मग इतर धर्मीयांसाठी साकाहीर मंडळी मांस खातील का असा सवाल एका ट्विटरकराने केला आहे. ' बीफ बंदी, मांस बंदी, राजकारण्यांवर टीका करण्यास बंदी, एकमेकांस भेटण्यास बंदी.. वेलकम टू मुंबई ..'बॅनि'स्तानची राजधानी' अशा शब्दांत ट्विटरवरील एका महिलेने आपला संताप नोंदवला आहे. 'आम्हाला हॉस्पिटल्स, स्वच्छतागृहे, चांगले रस्ते, रेल्वे किंवा सुरक्षा या प्रश्नांबद्दल काळजी नाही. पण तुम्ही काय बघता आणि काय खाता यातच आम्हाला रस आहे' असे ट्विटही एका व्यक्तीने केले आहे.