शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

...मग बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का - ओवेसी

By admin | Updated: September 8, 2015 16:46 IST

मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग आता बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ - पर्युषणादरम्यान मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचा निर्णय फेटाळून लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मुंबईत चार तर मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसासांठी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या निर्णयाविरोधात भाजपावर टीकेची झोड उठली असून शिवसेना, मनसे या पक्षांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. आता एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. मांसविक्रीवरील बंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले, धर्म एवढा महत्त्वाचा असेल तर बकरी ईददरम्याना मटण वाटले पाहिजे व भाजीविक्रीवर बंदी टाकायला हवी, हे तुम्हाला सहन होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असून अशा शहरात मांसविक्रीच्या व्यवसायावर बंदी घालणे योग्य नाही. हा फक्त मुस्लिमांचा विषय नसून याला आर्थिक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. मांसविक्रीवर अवलंबून असलेले कामगार या कालावधीत उदारनिर्वाह कसा करणार असा प्रश्न त्यांनी सत्ताधा-यांना विचारला. 
 
मांसबंदीमुळे ट्विटरवरही संताप
दरम्यान मीटबॅनच्या या निर्णयावर सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत असून ट्विटरवर तर  #meatban हा हॅशटॅग आज टॉप ट्रेंडिग विषय ठरला आहे. सामान्य जनतेसह सोनम कपूरसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही या बंदीविरोधात आवाज उठवत निषेध नोंदवला असून आहे. काही ट्विटरकरांनी तर मुंबईचा उल्लेख 'बॅनि'स्तान असा केला आहे असून काहींनी भाजप म्हणजे 'भारतीय जैन पार्टी' असल्याचे म्हटले आहे. 
 
'आपला देश अजूनही तिस-या जगातच वावरत आहे, मांसबंदीने आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडले आहे' अशी टीका अभिनेत्री सोनम कपूरने केली आहे. तर एका धर्माचे पावित्र्य जपण्यासाठी अन्य धर्मीय मांसाहार सोडत असतील तर मग इतर धर्मीयांसाठी साकाहीर मंडळी मांस खातील का असा सवाल एका ट्विटरकराने केला आहे. ' बीफ बंदी, मांस बंदी, राजकारण्यांवर टीका करण्यास बंदी, एकमेकांस भेटण्यास बंदी.. वेलकम टू मुंबई ..'बॅनि'स्तानची राजधानी' अशा शब्दांत ट्विटरवरील एका महिलेने आपला संताप नोंदवला आहे. 'आम्हाला हॉस्पिटल्स, स्वच्छतागृहे, चांगले रस्ते, रेल्वे किंवा सुरक्षा या प्रश्नांबद्दल काळजी नाही. पण तुम्ही काय बघता आणि काय खाता यातच आम्हाला रस आहे' असे ट्विटही एका व्यक्तीने केले आहे.