शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

...आणि श्रीपाल सबनिसांनी साहित्यिकांना उघडे पाडले!

By admin | Updated: January 3, 2016 02:01 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केवळ ते एकटे उघडे पडलेले नाहीत, तर समस्त मराठी साहित्यिकांच्या लिखाणांवरही

- अतुल कुलकर्णी (निमित्तमात्र )मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केवळ ते एकटे उघडे पडलेले नाहीत, तर समस्त मराठी साहित्यिकांच्या लिखाणांवरही भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो, त्याने समाजाला दिशा दिली पाहिजे, असे सांगितले जात असताना, आजच्या साहित्यात समाजाचे कोणतेच प्रतिबिंब कसे उमटत नाही आणि साहित्यिक रोजच्या जगण्याच्या व्यवहारापासून कसे तुटून गेले आहेत, हेही लख्खपणे समोर आले आहे, तसेच आपापल्या परिने समाजाशी नाळ जोडून लिखाण करणाऱ्या साहित्यिकांचाही सबनिसांच्या वक्तव्याने अवमान झाला आहे.दुनियादारी, कट्यार काळजात घुसली किंवा नटसम्राट हे पन्नास साठ वर्षांपूर्वीचे विषय आजही सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्या काळजात घर करतात. मात्र, दुसरीकडे आजच्या एखाद्या विषयावर अशी साहित्यकृती का तयार होत नाही, याचेही उत्तर सबनीस यांना द्यावे लागणार आहे. समकालीन प्रकाशनासारखी संख्या जाणीवपूर्वक वेगळ्या विषयावरची पुस्तके काढते, ज्याच्या अनेक आवृत्त्या निघतात, तो जागलेपणा संमेलनाचे अध्यक्ष झालेल्या सबनिसांना आहे की नाही, असाही प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जरी अचानक गेले असे चित्र समोर आले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा गोष्टी अचानक होत नसतात. देशातल्या माध्यमांना आणि अमेरिकेसारख्या गुप्तहेर संघटनेपासूनही मोदींची भेट लपून राहिली हा खरा अभ्यासाचा विषय तमाम विचारवंत, अभ्यासक, साहित्यिकांसाठी असायला हवा होता. मात्र, सबनिसांनी हा विषय अत्यंत उथळपणे मांडला. शिवाय प्रख्यात कवी मंगेश पाडगांवकर यांच्या अंत्ययात्रेला मोजके ५० ते १०० लोकच कसे उपस्थित राहिले, याचे मनोज्ञ चिंतन सबनिसांनी केले असते, तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असती.मराठी साहित्य कथा, कादंबऱ्या, कवितांच्या पलीकडे गेले आहे. मात्र, मराठी पुस्तके हल्ली वाचली जात नाहीत, असे बेधडक विधानही सबनीस यांनी केले आहे. त्यांच्या माहितीसाठी काही उदाहरणे मुद्दाम सांगावी वाटतात. विश्वास पाटील यांनी लासलगावच्या कांदा व्यवहारावर ‘पांगिरा’ कादंबरी लिहिली, निवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी यांनी ‘कुण्या एकाची धरणगाथा’ हे पुस्तक एका सत्य कथेवर आधारित असूनही किती अस्वस्थ करते, हे वाचल्यावर कळेल. दिल्लीचा एक पत्रकार अमीन सेठी दोन वर्षे बांधकाम मजुरांमध्ये राहिला, त्यांचे जग त्याने पाहिले आणि ‘एक आझाद इसम’ हे पुस्तक त्याने लिहिले, अमिता नायडू नावाच्या महिलेने रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या मुलांचे आयुष्य त्यांच्यासोबत राहून पाहिले आणि ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे पुस्तक लिहिले. बरखा दत्त यांचे अनक्वाएट लँड, रोमिला थापर यांचे दि पास्ट एस प्रेझेन्ट, सलमान रश्दी यांचे टू इयर्स ऐट मन्थ्स, टष्ट्वेंटी एट नाइटस् किंवा निळू दामले यांचे साखर कारखान्यांच्या राजकारणावरचे पुस्तक असो किंवा अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवरचे थाउजंड स्प्लेंडीड सन ही अगदीच मोजकी उदाहरणे आहेत. येथे उल्लेख केलेल्या काही प्रयोगांच्या पाठीशी साहित्यिक किती वेळा ठामपणे उभे राहिले, याचेही उत्तर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिले पाहिजे. राज्यात दुष्काळ आहे, पाण्यासाठी गावच्या गावे स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. समाजाची ऐकून घेण्याची मानसिकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, राजकारणी बेभान होताना दिसतात, महिला देशाच्या सर्वाेच्च पदी असतानाच, लहान मुलींवर अत्याचार होतात, टोकाचे विरोधाभास पावलोपावली दिसत आहेत, याचे कोणतेच प्रतिबिंब साहित्यिकांकडून का उमटत नाही, याचा शोध संमेलनाचे अध्यक्ष म्हणून घ्यायचा सोडून, मोदींनी काय करावे आणि काय नाही, यावर बोलून सबनिसांनी अध्यक्षपदाचीही बूज राखलेली नाही.आपण लेखक आहोत, नेता नाही, याचे भान ठेवून मोदींची जी गोष्ट पटली नाही, त्यावर अभ्यासपूर्ण लेखन सबनीस करू शकले असते. मात्र, संमेलनाचे अध्यक्ष झालो की, विचारल्या जाणाऱ्या प्रत्येकच गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचे काम ते करू लागले, तर लिखाणाचे काम मोदी, गडकरींनी करायचे का? मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्यापेक्षा, समाजाला, सरकारला मार्गदर्शन होईल, असे लिखाण केले पाहिजे, त्यांच्या अस्वस्थतेतून समाजाला दिशा मिळाली पाहिजे, असे विचार मांडले होते. साहित्यिकांना असे सल्ले देण्याची वेळ जर मुख्यमंत्र्यांवर येत असेल, तर साहित्यिकांनी आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे. मात्र, सबनिसांच्या उथळ विधानांनी साहित्यात चांगले काम करणाऱ्यांचाही अवमान झाला आहे, हे नक्की.