शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

...अन् शिवसेनेने केले भाजपाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 05:48 IST

एरवी प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवरून भाजपावर बोचरी टीका करणा-या शिवसेनेने रविवारी मात्र भाजपाचे कौतुक केले. ईशान्य भारतातील भाजपाचा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखे आहे. सुनील देवधर नावाच्या एका मराठी माणसाने कम्युनिस्टांची राजवट उलथवून टाकली...

मुंबई - एरवी प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवरून भाजपावर बोचरी टीका करणा-या शिवसेनेने रविवारी मात्र भाजपाचे कौतुक केले. ईशान्य भारतातील भाजपाचा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखे आहे. सुनील देवधर नावाच्या एका मराठी माणसाने कम्युनिस्टांची राजवट उलथवून टाकली, अशा शब्दांत भाजपाचे कौतुक करतानाच या निकालामुळे मोदी-शाह यांच्याशिवाय भाजपामध्ये तिसरा माणूस उदयाला आला, अशी कोपरखळी मारायलाही शिवसेना विसरली नाही.ईशान्य भारतातील तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया देताना भाजपाचे कौतुक केले. देशाच्या राजकारणापेक्षा, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा असल्याचे राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश, गुजरातमधला विजय सोपा असतो. तेथे पक्षाची बांधणी आहे. राम मंदिर, गोध्रासारखे विषय असतात फोडणी द्यायला. पण त्रिपुरा, नागालँडसारख्या राज्यात जाऊन काम करणे, पक्ष उभा करणे आणि विजय मिळवणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असते. या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्तापरिवर्तन होणे गरजेचे होते. त्यामुळे भाजपाचा हा विजय महत्त्वाचा वाटतो, असे राऊत म्हणाले.आशिष शेलारांना तिखट भाषेत प्रत्युत्तरज्यांच्या डोक्यात किडे वळवळत असतात ते नाखूश असतात, अशा शब्दांत राऊत यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा समाचार घेतला. ईशान्येतील यश देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे राष्ट्रीय विचारांचा पगडा असलेला एक पक्ष उभा राहतो आणि जिंकून येतो तेव्हा ते निकाल देशासाठी महत्त्वाचे ठरतात.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना