शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

...आणि माझ्या दोस्ताने इतिहास घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:34 IST

३ जानेवारी, १९८५ रोजी ‘मोरूची मावशी’ हे आमचे नाटक सुरू झाले. या नाटकासाठी विजय चव्हाणचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे याने सुचविले होते.

प्रशांत दामले३ जानेवारी, १९८५ रोजी ‘मोरूची मावशी’ हे आमचे नाटक सुरू झाले. या नाटकासाठी विजय चव्हाणचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे याने सुचविले होते. मग आमची टीम तयार झाली. आमची मुळात ‘टूरटूर’ची गँग होती. वास्तविक, मावशीचे काम लक्ष्मीकांतने करावे, असे सुधीर भट यांचे म्हणणे होते, पण त्याने विजयला पुढे केले. दिलीप कोल्हटकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. रवींद्र नाट्य मंदिरात आमच्या तालमी चालायच्या. या नाटकातले गद्य कमी करून त्यातले पद्य वाढवावे, असा निर्णय कोल्हटकरांनी घेतला. मंगेश कुलकर्णीने पाच-सहा पानांची गाणी बनविली. अशोक पत्कींनी चाली दिल्या. असे करत करत या नाटकाने जवळजवळ ‘संगीत मोरूची मावशी’ असे रूप धारण केले. विजयला शंभर टक्के आत्मविश्वास हा आधीपासूनच होता, पण त्याचे जरा गाण्यापाशी अडकायचे. मात्र, त्याने त्याच्या आत्मविश्वासाच्या बळावर तेही साध्य करून दाखविले. या नाटकातल्या ‘टांग टिंग टिंगा’ या विजयच्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि मग इतिहासच घडला.१९८५ मध्ये आमचे ‘मोरूची मावशी’ हे नाटक आले आणि १९८६ मध्ये माझे ‘ब्रह्मचारी’ हे नाटक आले. ‘ब्रह्मचारी’ या नाटकात मी मुख्य भूमिका साकारावी, असे सुधीर भट यांनी मला सांगितले. मी त्यासाठी तयार नव्हतो, कारण माझे ‘मोरूची मावशी’ हे नाटक चांगले सुरू होते. नीट चाललेले नाटक सोडून नवीन नाटकात कसे काम करायचे, असा प्रश्न मला पडला होता, पण विजय चव्हाण याने याबाबत पुढाकार घेतला. त्याने मला बाजूला घेऊन समजावले. प्रशांत, तुला मेन रोलचा चान्स मिळतोय, तर तू ते नाटक करायला हवेस आणि त्यातून जेव्हा तुला ‘ब्रह्मचारी’चा प्रयोग नसेल, तेव्हा तू ‘मोरूची मावशी’ करत जा. अर्थात, आम्ही तुला मिस करू, पण त्यासाठी तू मोठा रोल सोडू नकोस. असे सांगून विजयने माझी मानसिक तयारी करून घेतली. सहकारी कलाकाराकडून मिळणारी अशी वागणूक फार दुर्मीळ असते. मला वाटत होते की, ‘मोरूची मावशी’मध्ये मी मोरूची भूमिका केली नाही, तर दुसऱ्या कुणाला तरी उभे केले जाईल. अशाने नाटकाची भट्टी बिघडण्याचा संभव असतो, पण विजयने माझे काही एक ऐकले नाही आणि मी ‘ब्रह्मचारी’ केले.विजयची आणि माझी छान दोस्ती होती. आम्ही एकत्र चित्रपटसुद्धा खूप केले. विजय चव्हाण म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कॉम्बिनेशन होते. विजयने अनेक भूमिका शून्यातून निर्माण केल्या. आपल्याकडे जे आहे, ते जास्तीतजास्त रुचकर करून कसे सादर करता येईल हे तो पाहायचा. एखाद्या सीनमध्ये जरी दम नसला, तरी त्यात आपल्याला वेगळे काही कसे करता येईल, याचा विजय मनापासून प्रयत्न करायचा. त्याने कधी पाट्या टाकल्याचे मला आठवत नाही. अतिशय मन लावून तो काम करायचा. त्याच्या यशाची तीच पावती म्हणायला हवी.(शब्दांकन : राज चिंचणकर)

 

टॅग्स :Vijay Chavanविजय चव्हाणPrashant Damleप्रशांत दामले