शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

...आणि माझ्या दोस्ताने इतिहास घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:34 IST

३ जानेवारी, १९८५ रोजी ‘मोरूची मावशी’ हे आमचे नाटक सुरू झाले. या नाटकासाठी विजय चव्हाणचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे याने सुचविले होते.

प्रशांत दामले३ जानेवारी, १९८५ रोजी ‘मोरूची मावशी’ हे आमचे नाटक सुरू झाले. या नाटकासाठी विजय चव्हाणचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे याने सुचविले होते. मग आमची टीम तयार झाली. आमची मुळात ‘टूरटूर’ची गँग होती. वास्तविक, मावशीचे काम लक्ष्मीकांतने करावे, असे सुधीर भट यांचे म्हणणे होते, पण त्याने विजयला पुढे केले. दिलीप कोल्हटकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. रवींद्र नाट्य मंदिरात आमच्या तालमी चालायच्या. या नाटकातले गद्य कमी करून त्यातले पद्य वाढवावे, असा निर्णय कोल्हटकरांनी घेतला. मंगेश कुलकर्णीने पाच-सहा पानांची गाणी बनविली. अशोक पत्कींनी चाली दिल्या. असे करत करत या नाटकाने जवळजवळ ‘संगीत मोरूची मावशी’ असे रूप धारण केले. विजयला शंभर टक्के आत्मविश्वास हा आधीपासूनच होता, पण त्याचे जरा गाण्यापाशी अडकायचे. मात्र, त्याने त्याच्या आत्मविश्वासाच्या बळावर तेही साध्य करून दाखविले. या नाटकातल्या ‘टांग टिंग टिंगा’ या विजयच्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि मग इतिहासच घडला.१९८५ मध्ये आमचे ‘मोरूची मावशी’ हे नाटक आले आणि १९८६ मध्ये माझे ‘ब्रह्मचारी’ हे नाटक आले. ‘ब्रह्मचारी’ या नाटकात मी मुख्य भूमिका साकारावी, असे सुधीर भट यांनी मला सांगितले. मी त्यासाठी तयार नव्हतो, कारण माझे ‘मोरूची मावशी’ हे नाटक चांगले सुरू होते. नीट चाललेले नाटक सोडून नवीन नाटकात कसे काम करायचे, असा प्रश्न मला पडला होता, पण विजय चव्हाण याने याबाबत पुढाकार घेतला. त्याने मला बाजूला घेऊन समजावले. प्रशांत, तुला मेन रोलचा चान्स मिळतोय, तर तू ते नाटक करायला हवेस आणि त्यातून जेव्हा तुला ‘ब्रह्मचारी’चा प्रयोग नसेल, तेव्हा तू ‘मोरूची मावशी’ करत जा. अर्थात, आम्ही तुला मिस करू, पण त्यासाठी तू मोठा रोल सोडू नकोस. असे सांगून विजयने माझी मानसिक तयारी करून घेतली. सहकारी कलाकाराकडून मिळणारी अशी वागणूक फार दुर्मीळ असते. मला वाटत होते की, ‘मोरूची मावशी’मध्ये मी मोरूची भूमिका केली नाही, तर दुसऱ्या कुणाला तरी उभे केले जाईल. अशाने नाटकाची भट्टी बिघडण्याचा संभव असतो, पण विजयने माझे काही एक ऐकले नाही आणि मी ‘ब्रह्मचारी’ केले.विजयची आणि माझी छान दोस्ती होती. आम्ही एकत्र चित्रपटसुद्धा खूप केले. विजय चव्हाण म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कॉम्बिनेशन होते. विजयने अनेक भूमिका शून्यातून निर्माण केल्या. आपल्याकडे जे आहे, ते जास्तीतजास्त रुचकर करून कसे सादर करता येईल हे तो पाहायचा. एखाद्या सीनमध्ये जरी दम नसला, तरी त्यात आपल्याला वेगळे काही कसे करता येईल, याचा विजय मनापासून प्रयत्न करायचा. त्याने कधी पाट्या टाकल्याचे मला आठवत नाही. अतिशय मन लावून तो काम करायचा. त्याच्या यशाची तीच पावती म्हणायला हवी.(शब्दांकन : राज चिंचणकर)

 

टॅग्स :Vijay Chavanविजय चव्हाणPrashant Damleप्रशांत दामले