शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
4
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
5
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
6
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
7
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
8
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
9
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
10
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
11
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
12
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
13
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
14
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
15
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
16
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
17
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
18
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
19
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
20
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

...आणि लालू प्रसाद यादव यांनी दाखवला होता उदारपणा

By admin | Updated: May 7, 2014 21:16 IST

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला.

२00६ मध्ये रेल्वेच्या सिरियल ब्लास्टमधील मृतांच्या नातेवाईकांना मिळवून दिली ५ लाखांची मदत

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर २00६ मध्ये सिरियल ब्लास्ट झाला आणि मुंबईत एकच हाहाकार उडाला. यात तब्बल २00 पेक्षा अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांनी तर आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमावला. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला. मात्र हाच उदारपणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍या नातेवाईकांच्या बाबतीत दाखविला नाही. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. ११ जुलै २00६ रोजी अकरा मिनिटांच्या अंतराने पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात २0९ जणांचा मृत्यू तर ७00 जण जखमी झाले. रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना होती. तेव्हा मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेची माहीती मिळताच त्यावेळी रेल्वेमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी मुंबई गाठली आणि घटनास्थळांना भेट दिली. सुरुवातीला रेल्वेतर्फे मृताच्या नातेवाईकांना तातडीची ५0 हजार रुपये मदत देण्यात आली होती. मात्र ही मदत तोकडी असल्याने त्यांनी आपल्या अधिकार वापरुन त्यात साडे चार लाख रुपयांची वाढ केली आणि एकूण पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना दिले. तर घरातील कर्ताधर्ता व्यक्ती गमावलेल्यांना त्यांनी नोकरीही देण्याचा निर्णय घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मिळाली का नाही याचा पाठपुरावाही त्यांच्याकडून त्यावेळी करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर नोकरी देण्याबाबत कुठले निकष आहेत याची पडताळणीही त्यांनी केली आणि तशी मदतही त्यांनी केली. लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळी आपला अधिकार वापरुन आर्थिक मदतीत वाढ करुन मदत दिल्याची ती पहिलीच घटनाही असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र दुदैवी कोकणवासियांच्या बाबतीत अशी आर्थिक मदत त्यांना मिळालीच नाही. कोकणात जाणार्‍या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला आणि या अपघातात तब्बल २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. कोकण रेल्वेवर झालेल्या या अपघातात अनेकांना आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमवावा लागला. मात्र त्याची जराही तमा न बाळगता रेल्वे प्रशासनाकडून अवघे दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन आणि त्याची माहीती घेतल्यानंतरही नुकसान भरपाई वाढवून देण्याबाबत साधा ब्र देखिल न काढल्याने लालू प्रसाद यादव यांच्याकडून त्यांनी धडा घ्यावा, अशी मागणीच आता कोकणवासियांकडून केली जात आहे.