शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...आणि लालू प्रसाद यादव यांनी दाखवला होता उदारपणा

By admin | Updated: May 7, 2014 21:16 IST

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला.

२00६ मध्ये रेल्वेच्या सिरियल ब्लास्टमधील मृतांच्या नातेवाईकांना मिळवून दिली ५ लाखांची मदत

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर २00६ मध्ये सिरियल ब्लास्ट झाला आणि मुंबईत एकच हाहाकार उडाला. यात तब्बल २00 पेक्षा अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांनी तर आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमावला. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला. मात्र हाच उदारपणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍या नातेवाईकांच्या बाबतीत दाखविला नाही. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. ११ जुलै २00६ रोजी अकरा मिनिटांच्या अंतराने पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात २0९ जणांचा मृत्यू तर ७00 जण जखमी झाले. रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना होती. तेव्हा मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेची माहीती मिळताच त्यावेळी रेल्वेमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी मुंबई गाठली आणि घटनास्थळांना भेट दिली. सुरुवातीला रेल्वेतर्फे मृताच्या नातेवाईकांना तातडीची ५0 हजार रुपये मदत देण्यात आली होती. मात्र ही मदत तोकडी असल्याने त्यांनी आपल्या अधिकार वापरुन त्यात साडे चार लाख रुपयांची वाढ केली आणि एकूण पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना दिले. तर घरातील कर्ताधर्ता व्यक्ती गमावलेल्यांना त्यांनी नोकरीही देण्याचा निर्णय घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मिळाली का नाही याचा पाठपुरावाही त्यांच्याकडून त्यावेळी करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर नोकरी देण्याबाबत कुठले निकष आहेत याची पडताळणीही त्यांनी केली आणि तशी मदतही त्यांनी केली. लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळी आपला अधिकार वापरुन आर्थिक मदतीत वाढ करुन मदत दिल्याची ती पहिलीच घटनाही असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र दुदैवी कोकणवासियांच्या बाबतीत अशी आर्थिक मदत त्यांना मिळालीच नाही. कोकणात जाणार्‍या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला आणि या अपघातात तब्बल २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. कोकण रेल्वेवर झालेल्या या अपघातात अनेकांना आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमवावा लागला. मात्र त्याची जराही तमा न बाळगता रेल्वे प्रशासनाकडून अवघे दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन आणि त्याची माहीती घेतल्यानंतरही नुकसान भरपाई वाढवून देण्याबाबत साधा ब्र देखिल न काढल्याने लालू प्रसाद यादव यांच्याकडून त्यांनी धडा घ्यावा, अशी मागणीच आता कोकणवासियांकडून केली जात आहे.