शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्या दाम्पत्याचा अहंकार विखुरला,मुलावरील प्रेम ठरले वरचढ

By admin | Updated: January 17, 2017 22:56 IST

आई-वडिलांसाठी त्यांची मुलेच सर्वस्व असतात. मुलांसाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी असते. उच्च न्यायालयातील एका प्रकरणामुळे हा अनुभव अनेकांना आला.

राकेश घानोडे / ऑनलाइन लोकमतनागपूर : आई-वडिलांसाठी त्यांची मुलेच सर्वस्व असतात. मुलांसाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी असते. उच्च न्यायालयातील एका प्रकरणामुळे हा अनुभव अनेकांना आला. मुस्लीम आई-वडिलाने एकुलत्या एक मुलाच्या भविष्यासाठी आपसातील भांडण सामंजस्याने संपवले.

सर्वांचे प्रयत्न हरल्यानंतर केवळ मुलावरील प्रेमामुळे त्यांच्यातील अहंकार विखुरला. प्रकरणातील दाम्पत्य अनवर व झेबा (काल्पनिक नावे) नागपुरातील रहिवासी आहेत. ४ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांचे लग्न झाले. यानंतर ते काही वर्षे आनंदात एकत्र राहिले. दरम्यान, त्यांना मुलगा झाला. मुलाचे चांगले पालन-पोषण करून त्याला यशस्वी व्यक्ती करण्याची स्वप्ने त्यांनी रंगवली. परंतु, अचानक त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. वाद वाढत गेला. दोघांपैकी कोणीच माघार घेतली नाही. नातेवाईकांनी समजावूनही त्यांच्यातील दुरावा कमी झाला नाही. रागाच्या भरात झेबाने अनवर हा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची तक्रार सक्करदरा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अनवरविरुद्ध भादंविच्या कलम ४९८-अ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला. त्यानंतर दोघेही विभक्त झाले. 

अनवर व झेबामधील भांडणाचा सर्वाधिक त्रास त्यांच्या मुलाला झाला. मुलाची परवड व्हायला लागली. मुलाला आई व वडील हे दोघेही हवे होते. मुलावर जीवापाड प्रेम असलेल्या अनवर व झेबाला त्याच्या जीवाची घालमेल सहन झाली नाही. त्यांनी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामंजस्याने भांडण संपवून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते एकत्र रहायला लागले आहेत. अनवर व झेबाने घेतलेली भूमिका अन्य पालकांसाठी आदर्श ठरेल असे मत अनेक वकिलांनी व्यक्त केले.हायकोर्टाने ठरवली तडजोड वैधअनवर व झेबाच्या नव्याने फुललेल्या संसारातील अडचणी सक्करदरा पोलीस ठाण्यातील ‘एफआयआर’मुळे वाढण्याची शक्यता होती.  कायद्यानुसार ‘एफआयआर’ रद्द करणे आवश्यक होते. त्यासाठी अनवरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी अनवर व झेबातील तडजोड वैध ठरवून एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश देताना ‘बी. एस. जोशी वि. हरयाणा शासन’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे.  अनवर व झेबा न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित होते. मुलाच्या भविष्यासाठी वाद सामंजस्याने संपविल्याचे व आता एकत्र रहात असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.