शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

अन् सुनेने केली स्वप्नपूर्ती

By admin | Updated: November 1, 2014 01:36 IST

आधी जनसंघ, जनता पार्टी आणि आता भाजपा उमेदवाराला यशस्वी करण्याचे तब्बल 4क् वर्षाचे स्वप्न आज विद्या ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना पूर्णत्वाला नेले.

चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा सुधीर मुनगंटीवारांच्या मंत्रिपदाने वाढल्या आहेत. केवळ मतदार संघाचेच नव्हे तर, जिल्ह्याचे रूप त्यांनी पालटावे, अशा अपेक्षा जनतेने व्यक्त केल्या आहेत.‘लोकमत’ने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा आणि प्रेम जाणवले. मूलमधील भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोती टहलियानी म्हणाले, मागील पाच वर्षे मंत्री नसताना मूल तालुक्याचा विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावेळी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असल्याने ते क्षेत्राचा विकास साधतील असा आत्मविश्वास आहे. मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गांगरेड्डीवार म्हणाले, तालुक्यात सिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. त्यामुळे ह्युुमन प्रकल्प, गोसिखुर्द प्रकल्प मार्गी लावून त्यांनी तालुक्यात सिंचनाची सोय करावी व मूल तालुका सुजलाम सुफलाम करावा.जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंदू मारगोनवार म्हणाले, विकासाचा महामेरु म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांची ख्याती आहे. मंत्री झाल्यावर त्यांची जबाबदारी वाढली असून सर्व सामान्याचा न्याय देण्यासाठी विशेष तत्पर राहतील. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले म्हणाल्या, विकासाची तळमळ व काम करण्याची तत्परता सुधीर मुनगंटीवार यांच्या नसानसात भिनली आहे. त्यामुळे विधानसभेत त्यांना संसदपटू उपाधीने गौरविण्यात आले आहे. मंत्री झाल्याने विकासाला प्राधान्य देतील असा विश्वास आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामान्य नागरिकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. मूल येथील नामदेव काळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी जात, पक्ष भेद न करता सर्वसामान्य नागरिकांची कामे केली आहेत. त्यांच्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, ते मंत्री झाल्याने गरिबांच्या मागण्यांना न्याय मिळेल. मूल येथील अशोक गावतुरे म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. त्यांनी जातीपलीकडे जाऊन राजकारण केले. त्यामुळे सर्वसामान्यांचे ते लाडके आहेत.मूल येथील कमलाकर नवघडे म्हणाले, सर्वसामान्यांचा नेता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. ते सर्व सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत आले. पुढेही ते सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्रथम स्थान देतील. मूल येथील मोती टहलियानी म्हणाले, पाच वर्षे मंत्री नसतानासुध्दा त्यांनी मूल तालुक्याच्या विकासाठी प्रयत्न केलेत. ते मंत्री झाल्याने तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. चंद्रपूर येथील माणिक नरडे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील नेते असल्याने त्यांना विदर्भातील समस्यांची चांगली जाण आहे. सिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांच्या मंत्री होण्यामुळे सुटण्याची आशा आहे. प्रविण इटनकर म्हणाले, जिल्ह्यातील नेत्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याचे वजन वाढले आहे. गोरगरिबांच्या समस्या शासनस्तरावर जाऊन त्यांचा तत्काळ निपटारा होईल. प्रमोद विश्वकर्मा म्हणाले, जिल्ह्यात प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. तर गुन्हेगारीनेही तोंड वर केले आहे. मंत्री पद जिल्ह्याला मिळाल्याने प्रदूषण व गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी आशा आहे. भाजपाचे बल्लारपूर येथील ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल म्हणाले, आज आमच्यासाठी निश्चितच सोनियाचा दिन ठरलाय. मुनगंटीवार हे दिलेली आश्वासन नक्कीच पूर्ण करतील, असा ठाम विश्वास आहे.