शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

नित्यनवीन नेपथ्य निर्मितीतच आनंद - बाबा पार्सेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 3:39 AM

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेली तब्बल पाच दशके त्यांनी नेपथ्य निर्मिती करत रंगभूमीवर अमूल्य योगदान दिलेले आहे. ‘असुनी नाथ मी अनाथ’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘सुरुंग’, ‘मला उत्तर हवंय’, ‘मला काही सांगायचंय’, ‘श्री तशी सौ’अशा अनेक नाटकांपासून अलीकडेच रंगभूमीवर आलेल्या ‘यस माय डिअर’ या नाटकापर्यंत त्यांनी आपल्या नेपथ्याचा ठसा रंगभूमीवर उमटवला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधत बाबा पार्सेकर यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांनी साधलेला विशेष संवाद...प्रश्न- या पुरस्काराबद्दल तुमच्या काय भावना आहेत?उत्तर - हा पुरस्कार पडद्यामागच्या कलाकाराला दिला गेला, याचा आनंद मोठा आहे. दुसरे म्हणजे, हा पुरस्कार प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने आहे. त्यांचे व माझे खूप जुने संबंध होते. आम्ही दोघेही गोव्याचे! आम्हाला एकमेकांविषयी प्रचंड आदर! त्यामुळे पणशीकरांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याचे मोठे समाधान मला आहे.गेली पाच दशके तुम्ही नाट्यक्षेत्रात कार्यरत आहात. नेपथ्य निर्मितीच्या दृष्टीने तेव्हाचा आणि आताचा काळ यात विशेष काही फरक जाणवतो का?१९६४मध्ये मी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. आता काळाच्या ओघात या क्षेत्रात फरक झालेला आहेच. नेपथ्याच्या बाबतीत म्हणायचे तर आता सगळेकाही ‘रेडिमेड’ झालेआहे. त्या काळी आमचे पेंटर हाताने रंगवून नेपथ्य उभे करायचे. नाटकात एखादा बगिचा, रस्ता किंवा महाल वगैरे दाखवायचा असेल, तर तो पडद्यावर प्रत्यक्ष रंगवला जायचा. तो तयार झाल्यावर आपण खरेच त्या स्थळी उभे आहोत, असा फील यायचा. आता कॉम्प्युटरवर डिझाईन तयार करतात आणि हवा तो इफेक्ट आणला जातो.मराठी नाटक आजही दिवाणखान्यातून बाहेर पडायला मागत नाही, असा एक आक्षेप नोंदवला जातो, त्याबद्दल तुमचे मत काय?लेखक जेव्हा नाटक लिहितो, तेव्हा अनेकदा तो दिवाणखान्याला गृहीत धरूनच चाललेला दिसतो. पण असे नेपथ्य साकारायचे असले तरी त्यातही काय वेगळेपणा आणता येईल, याचा नीट विचार करतो. संहितेची गरज असेल त्याप्रमाणे विचार करून नेपथ्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. आता लेखकाचे नाटकच जर दिवाणखान्यात घडणारे असेल, तर त्याला काय करणार? पण त्यातही काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करत असतो.आत्तापर्यंत तुम्ही घडवलेल्या नेपथ्यांपैकी तुमचे आवडते नेपथ्य कोणत्या नाटकाचे?मी अनेक नाटकांचे नेपथ्य केले आहे. तरीही एका नाटकाचे केलेले वास्तवदर्शी नेपथ्य माझ्या आजही जसेच्या तसे लक्षात आहे. ‘अमृत मोहिनी’ हे त्या नाटकाचे नाव! त्यात मी कैलास पर्वत उभारला होता. ते माझ्यापुढे आव्हान होते. पण ते नाटक गाजले. सध्या ‘यस माय डिअर’ या नाटकात मी एका कमर्शिअल आर्टिस्टचे घर उभे केले आहे. तेसुद्धा छान जमून आले आहे.तुमच्या नेपथ्य निर्मितीत दिग्दर्शकाचा किती सहभाग किंवा हस्तक्षेप असतो?उत्तर - मी नेपथ्य कागदावर मांडत नाही; मी त्याचे थेट मॉडेलच करतो. हे मॉडेल दिग्दर्शकाच्या समोर ठेवतो. ‘मी हे स्क्रिप्टनुसार केले आहे. यात तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो तुमचा अधिकार आहे,’ असे मी त्यांना सांगतो. कारण दिग्दर्शकाचा मान त्याला द्यायलाच हवा, असे मी मानतो.तुमच्या या यशस्वी कारकिर्दीत काही करायचे राहून गेले आहे असे वाटते का?खरं सांगू का... काही राहिले आहे याचा मी विचार करतच नाही. मला सतत नवनवीन काहीतरी करायचे असते आणि ते माझ्या डोक्यात सुरूच असते. प्रत्येक वर्षी मी नित्यनवीन काहीतरी करतच असतो आणि त्यातच माझा आनंद सामावला आहे.