शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नित्यनवीन नेपथ्य निर्मितीतच आनंद - बाबा पार्सेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 03:39 IST

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेली तब्बल पाच दशके त्यांनी नेपथ्य निर्मिती करत रंगभूमीवर अमूल्य योगदान दिलेले आहे. ‘असुनी नाथ मी अनाथ’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘सुरुंग’, ‘मला उत्तर हवंय’, ‘मला काही सांगायचंय’, ‘श्री तशी सौ’अशा अनेक नाटकांपासून अलीकडेच रंगभूमीवर आलेल्या ‘यस माय डिअर’ या नाटकापर्यंत त्यांनी आपल्या नेपथ्याचा ठसा रंगभूमीवर उमटवला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधत बाबा पार्सेकर यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांनी साधलेला विशेष संवाद...प्रश्न- या पुरस्काराबद्दल तुमच्या काय भावना आहेत?उत्तर - हा पुरस्कार पडद्यामागच्या कलाकाराला दिला गेला, याचा आनंद मोठा आहे. दुसरे म्हणजे, हा पुरस्कार प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने आहे. त्यांचे व माझे खूप जुने संबंध होते. आम्ही दोघेही गोव्याचे! आम्हाला एकमेकांविषयी प्रचंड आदर! त्यामुळे पणशीकरांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याचे मोठे समाधान मला आहे.गेली पाच दशके तुम्ही नाट्यक्षेत्रात कार्यरत आहात. नेपथ्य निर्मितीच्या दृष्टीने तेव्हाचा आणि आताचा काळ यात विशेष काही फरक जाणवतो का?१९६४मध्ये मी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. आता काळाच्या ओघात या क्षेत्रात फरक झालेला आहेच. नेपथ्याच्या बाबतीत म्हणायचे तर आता सगळेकाही ‘रेडिमेड’ झालेआहे. त्या काळी आमचे पेंटर हाताने रंगवून नेपथ्य उभे करायचे. नाटकात एखादा बगिचा, रस्ता किंवा महाल वगैरे दाखवायचा असेल, तर तो पडद्यावर प्रत्यक्ष रंगवला जायचा. तो तयार झाल्यावर आपण खरेच त्या स्थळी उभे आहोत, असा फील यायचा. आता कॉम्प्युटरवर डिझाईन तयार करतात आणि हवा तो इफेक्ट आणला जातो.मराठी नाटक आजही दिवाणखान्यातून बाहेर पडायला मागत नाही, असा एक आक्षेप नोंदवला जातो, त्याबद्दल तुमचे मत काय?लेखक जेव्हा नाटक लिहितो, तेव्हा अनेकदा तो दिवाणखान्याला गृहीत धरूनच चाललेला दिसतो. पण असे नेपथ्य साकारायचे असले तरी त्यातही काय वेगळेपणा आणता येईल, याचा नीट विचार करतो. संहितेची गरज असेल त्याप्रमाणे विचार करून नेपथ्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. आता लेखकाचे नाटकच जर दिवाणखान्यात घडणारे असेल, तर त्याला काय करणार? पण त्यातही काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करत असतो.आत्तापर्यंत तुम्ही घडवलेल्या नेपथ्यांपैकी तुमचे आवडते नेपथ्य कोणत्या नाटकाचे?मी अनेक नाटकांचे नेपथ्य केले आहे. तरीही एका नाटकाचे केलेले वास्तवदर्शी नेपथ्य माझ्या आजही जसेच्या तसे लक्षात आहे. ‘अमृत मोहिनी’ हे त्या नाटकाचे नाव! त्यात मी कैलास पर्वत उभारला होता. ते माझ्यापुढे आव्हान होते. पण ते नाटक गाजले. सध्या ‘यस माय डिअर’ या नाटकात मी एका कमर्शिअल आर्टिस्टचे घर उभे केले आहे. तेसुद्धा छान जमून आले आहे.तुमच्या नेपथ्य निर्मितीत दिग्दर्शकाचा किती सहभाग किंवा हस्तक्षेप असतो?उत्तर - मी नेपथ्य कागदावर मांडत नाही; मी त्याचे थेट मॉडेलच करतो. हे मॉडेल दिग्दर्शकाच्या समोर ठेवतो. ‘मी हे स्क्रिप्टनुसार केले आहे. यात तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो तुमचा अधिकार आहे,’ असे मी त्यांना सांगतो. कारण दिग्दर्शकाचा मान त्याला द्यायलाच हवा, असे मी मानतो.तुमच्या या यशस्वी कारकिर्दीत काही करायचे राहून गेले आहे असे वाटते का?खरं सांगू का... काही राहिले आहे याचा मी विचार करतच नाही. मला सतत नवनवीन काहीतरी करायचे असते आणि ते माझ्या डोक्यात सुरूच असते. प्रत्येक वर्षी मी नित्यनवीन काहीतरी करतच असतो आणि त्यातच माझा आनंद सामावला आहे.