शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

स्वातंत्र्यसैनिकाच्या रक्ताने माखलेल्या तिरंगी ध्वजाची ८१ वर्षे जुनी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 05:21 IST

१४ ऑगस्ट १९४२ या दिवशी पालघरची सरकारी कचेरी ताब्यात घेण्याची आणि त्यावर भारतीय झेंडा फडकावण्याची रणनीती ठरविण्यात आली.

हितेन नाईकपालघर : ८१ वर्षांपासून रक्ताने माखलेला तिरंगी ध्वज पालघरवासीयांनी केवळ वस्तू म्हणून जपला नाही तर त्यापासून नव्या पिढीला सतत प्रेरणा मिळाली पाहिजे, यासाठी तो ध्वज आणि त्याची कथा तरुण विद्यार्थ्यांसाठी जिवंत ठेवली आहे. ‘दिन खून के हमारे, यारो, न भूल जाना, खुशियोंमें अपनी, हम पें आसू बहाते जाना’, या काव्याच्या पंक्ती गाऊन हजारो पालघरवासीय ताठ मानेने आपली छाती फुगवून हुतात्म्यांना सलामी देत आले आहेत. त्याच झेंड्याची ही अत्यंत रोमहर्षक कथा

१४ ऑगस्ट १९४२ या दिवशी पालघरची सरकारी कचेरी ताब्यात घेण्याची आणि त्यावर भारतीय झेंडा फडकावण्याची रणनीती ठरविण्यात आली. याची चाहूल इंग्रजी सत्ताधाऱ्यांना लागल्यावर इन्स्पेक्टर अल्मिडा व त्यांच्यासोबत चार सशस्त्र शिपायांची तुकडी पालघरमध्ये तैनात करण्यात आली आणि १३ ऑगस्टपासून कचेरी रस्त्याच्या नाक्यावर सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा सुरू झाला. सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे पालघरमध्ये वातावरण तंग बनले. नांदगाव सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नवापूर आदी भागांतून हजारो सत्याग्रही पालघरच्या दिशेने निघाले. एक मोठा जमाव कचेरीवर तिरंगा फडकावण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा प्रांताधिकारी शेख मोहिद्दिन यांनी लोकांच्या दिशेने हातवारे करून अपशब्द वापरल्याने जमाव चवताळला. याचवेळी पाटीलकीचा राजीनामा देऊन संग्रामात सामील झालेल्या नांदगावच्या चिंतू नाना यांना पाहून ब्रिटिश अधिकारी भडकला. एक सरकारी माणूस मोर्चात पाहून त्यांनी चिंतू नानाच्या दंडाला पकडून शिवी देत जाब विचारला. हे चित्र पाहून नांदगावच्या तरुणांची एक फळी अल्मिडाच्या दिशेने चालून आली. लाठीहल्ला सुरू झाला. अनेक जण रक्तबंबाळ झाले. पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. गोळीबार सुरू झाला. 

त्या गर्दीत नांदगावच्या सेवा दलाचा शाखाप्रमुख गोविंद गणेश ठाकूर या अवघ्या १७ वर्षीय तरुणाने चित्त्याच्या चपळाईने पोलिसांच्या साखळीतून पुढे जात वंदे मातरम् अशी गर्जना करीत हातात ध्वज उंच धरून पुढे मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत कचेरीवर भारतीय झेंडा फडकावण्याचा  त्याचा निश्चय पोलिसांच्या लाठ्यांनी सुद्धा ढळला नाही. आपल्या हातातला राष्ट्रध्वज काढून घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत पोलिसांचा वेढा तोडीत तो पुढे सरकत होता. मात्र अल्मिडा या इंग्रज अधिकाऱ्याने जवळून झाडलेल्या गोळीने या तरुणाचा वेध घेतला. जखमी स्थितीतही त्याने वंदे मातरम्चा जयघोष करत आपल्या हातातला झेंडा खाली पडू दिला नाही. मात्र काही वेळाने तो खाली कोसळल्यावर हौतात्म्य प्राप्त झालेल्या त्या हुतात्म्याच्या रक्ताने हा झेंडा न्हाऊन गेला. गोविंद ठाकूर यांच्या रक्ताचे सिंचन झालेला हा ध्वज नंतर पोलिसांच्या नकळत सेवा दलाचे प्रसन्न नाईक यांनी पळवून आणण्यात यश मिळविले. या घटनेदरम्यान काशिनाथ भाई पागधरे (२६ वर्षे), राम प्रसाद भीमाशंकर तेवारी (१७ वर्षे), रामचंद्र माधव चुरी (२४ वर्षे), सुकुर गोविंद मोरे (२२ वर्षे) या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.

तोच हा झेंडा. त्या झेंड्याचे पावित्र्य राखण्याचे काम पालघरवासीय आजही करीत असून अंगात सळसळणाऱ्या रक्त असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे बीज रोवण्याचे काम मागील ८१ वर्षांपासून केले जात आहे.  त्या पवित्र झेंड्याचे जतन करण्याचे काम पालघर नगरपरिषद करीत असून तो एका फ्रेममध्ये जपून ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी पालघर शहरात घटनास्थळाच्या जवळ हुतात्मा स्तंभ येथे १४ ऑगस्टला याच पवित्र झेंड्याचे पूजन केले जाते.