शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीचा सुपुत्र विकास उईके दहशतवादी हल्ल्यात शहीद

By admin | Updated: September 19, 2016 17:40 IST

श्रीनगरपासून १० किलोमीटर अंतरावर जम्मू काश्मिरातील उरी शहरातील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. १९  : श्रीनगरपासून १० किलोमीटर अंतरावर जम्मू काश्मिरातील उरी शहरातील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके (२७) हा जवान शहीद झाला.

अमरावती जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर शहरातील ओंकारखेडा परिसरातील रहिवासी विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके हा सन २००९ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाला. त्याचे वडील जानरावर उईके हेदेखील ३४ वर्षे भारतीय लष्करात रणगाडा विभागात कार्यरत होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी लष्करात दाखल झाल्यानंतर वडिलांप्रमाणेच आपणही देशसेवा करावी, हे विकासचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अवघ्या २७ व्या वर्षी बारामुल्ला येथील रेजिमेंटच्या ६ बिहारमध्ये कार्यरत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीरमरण आले.

विकासच्या मृत्युची बातमी नांदगावात पोहोचताच गावात शोककळा पसरली. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. विकासच्या मित्रमंडळींना देखील हा धक्का पचविता आला नाही. संतप्त तरूणांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे देत निषेध नोंदविला. विकासच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. विकासच्या मृत्युमुळे संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासनासह महसूल विभागदेखील नांदगावात तळ ठोकून आहे. पुत्रवियोगाने आई-बहीण नि:शब्दविकास उईके हा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याची बातमी नांदगावात धडकल्यानंतर सकाळी ७ वाजतापासूनच त्याच्या घरासमोर गर्दी जमू लागली होती. परंतु तोपर्यंत विकासच्या कुटुंबीयांना ही माहिती नव्हती. मात्र, जमावाच्या चर्चेतून ही कुणकुण विकासच्या आई बेबीतार्इंच्या कानावर पडली आणि त्या काही वेळ नि:शब्द झाल्यात. त्यानंतर बेबीतार्इंसह विकासची बहीण सोनू हिने आक्रोश सुरू केला. विकासच्या बालपणीच्या सवंगड्यांनीही एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश पाहून समाजमन सुन्न झाले होते. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांशी शेवटचा संवादमंगळवार ६ सप्टेंबर रोजी दूरध्वनीद्वारे विकासने आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. आजारी बहीण सोनूची विचारपूस त्याने अगत्याने केली होती. गावी आल्यानंतर बहिणीला तो भेटणार होता. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच बहिणीला आणि कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. हा प्रसंग सांगताना त्याचा चुलतभाऊ प्रशांत उईके यालादेखील अश्रू अनावर झाले होते. नांदगावात कडकडीत बंद, पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन गावचा सुपूत्र विकास देशाचे रक्षण करताना धारातिर्थी पडला. तो शहीद झाला. हे वृत्त गावात पोहोचताच गावकरी स्तब्ध झाले. मात्र, गावकऱ्यांनी शहीद विकासच्या सन्मानार्थ स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. संतप्त तरूणांनी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये देखील बंद केली. काही गावकऱ्यांनी एकत्र येऊन बसस्थानकावर पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा आणि झेंड्याचे दहन केले. पाकिस्तानविरोधी नारेबाजी केल्याने तणावजन्य स्थिती उदभवली होती.