शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

अमरावतीचा सुपुत्र विकास उईके दहशतवादी हल्ल्यात शहीद

By admin | Updated: September 19, 2016 17:40 IST

श्रीनगरपासून १० किलोमीटर अंतरावर जम्मू काश्मिरातील उरी शहरातील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. १९  : श्रीनगरपासून १० किलोमीटर अंतरावर जम्मू काश्मिरातील उरी शहरातील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके (२७) हा जवान शहीद झाला.

अमरावती जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर शहरातील ओंकारखेडा परिसरातील रहिवासी विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके हा सन २००९ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाला. त्याचे वडील जानरावर उईके हेदेखील ३४ वर्षे भारतीय लष्करात रणगाडा विभागात कार्यरत होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी लष्करात दाखल झाल्यानंतर वडिलांप्रमाणेच आपणही देशसेवा करावी, हे विकासचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अवघ्या २७ व्या वर्षी बारामुल्ला येथील रेजिमेंटच्या ६ बिहारमध्ये कार्यरत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीरमरण आले.

विकासच्या मृत्युची बातमी नांदगावात पोहोचताच गावात शोककळा पसरली. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. विकासच्या मित्रमंडळींना देखील हा धक्का पचविता आला नाही. संतप्त तरूणांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे देत निषेध नोंदविला. विकासच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. विकासच्या मृत्युमुळे संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासनासह महसूल विभागदेखील नांदगावात तळ ठोकून आहे. पुत्रवियोगाने आई-बहीण नि:शब्दविकास उईके हा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याची बातमी नांदगावात धडकल्यानंतर सकाळी ७ वाजतापासूनच त्याच्या घरासमोर गर्दी जमू लागली होती. परंतु तोपर्यंत विकासच्या कुटुंबीयांना ही माहिती नव्हती. मात्र, जमावाच्या चर्चेतून ही कुणकुण विकासच्या आई बेबीतार्इंच्या कानावर पडली आणि त्या काही वेळ नि:शब्द झाल्यात. त्यानंतर बेबीतार्इंसह विकासची बहीण सोनू हिने आक्रोश सुरू केला. विकासच्या बालपणीच्या सवंगड्यांनीही एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश पाहून समाजमन सुन्न झाले होते. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांशी शेवटचा संवादमंगळवार ६ सप्टेंबर रोजी दूरध्वनीद्वारे विकासने आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. आजारी बहीण सोनूची विचारपूस त्याने अगत्याने केली होती. गावी आल्यानंतर बहिणीला तो भेटणार होता. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच बहिणीला आणि कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. हा प्रसंग सांगताना त्याचा चुलतभाऊ प्रशांत उईके यालादेखील अश्रू अनावर झाले होते. नांदगावात कडकडीत बंद, पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन गावचा सुपूत्र विकास देशाचे रक्षण करताना धारातिर्थी पडला. तो शहीद झाला. हे वृत्त गावात पोहोचताच गावकरी स्तब्ध झाले. मात्र, गावकऱ्यांनी शहीद विकासच्या सन्मानार्थ स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. संतप्त तरूणांनी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये देखील बंद केली. काही गावकऱ्यांनी एकत्र येऊन बसस्थानकावर पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा आणि झेंड्याचे दहन केले. पाकिस्तानविरोधी नारेबाजी केल्याने तणावजन्य स्थिती उदभवली होती.