शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती ‘एटीसी’ची खुर्ची कायम वादग्रस्त

By admin | Updated: July 28, 2014 01:25 IST

अमरावती येथून १४ जिल्ह्यांचा आदिवासी विकास विभागाचा कारभार चालविणाऱ्या अपर आयुक्तांची (एटीसी) खुर्ची कायम वादग्रस्त राहिली. भ्रष्टाचार, राजकारण, अंतर्गत कुरघोडी, चौकशी आणि मंत्रालयातून थेट

भ्रष्टाचारात आघाडी : आदिवासी विकास विभागाचा मंत्रालयातून ठरतो व्यवहारगणेश वासनिक- अमरावतीअमरावती येथून १४ जिल्ह्यांचा आदिवासी विकास विभागाचा कारभार चालविणाऱ्या अपर आयुक्तांची (एटीसी) खुर्ची कायम वादग्रस्त राहिली. भ्रष्टाचार, राजकारण, अंतर्गत कुरघोडी, चौकशी आणि मंत्रालयातून थेट हस्तक्षेप अशा एक ना अनेक कारणांनी हे पद कायम वादग्रस्त राहिले आहे. गत आठवड्यात भास्कर वाळिंबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्याने आदिवासी विकास विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली.अमरावती व औरंगाबाद महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांचा कारभार अमरावती येथील आदिवासी अपर आयुक्त सांभाळतात. आदिवासींच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी २०० कोटी रुपये खर्च करण्याची शासनाने एटीसीला मुभा दिली आहे. मात्र आतापर्यंत एटीसींचा झालेला कार्यकाळ बघता कोणीही अधिकारी वर्षभरापेक्षा अधिक काळ या खुर्चीवर बसले नाही. हे पद औट घटकेचे ठरते, असा इतिहास आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयातून चालविला जातो. यात ठाणे, नाशिक येथे आयएएस तर अमरावती, नागपूर येथे आयएफएस दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जातात. अमरावती येथील आदिवासी अपर आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी वनविभागातील अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरु राहते. ज्या अधिकाऱ्यांनी जास्त रक्कम मोजली त्यांना ही खुर्ची बहाल केली जाते. हा आदिवासी विभागात वर्षानुवर्षे चालत आलेला व्यवहार आजतागायत कायम आहे. त्यामुळे मंत्रालयात खुर्ची मिळवण्यासाठी मोजलेली रक्कम वसुलीसाठी एटीसीला अपहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कामे करावीच लागतात. बड्या वनअधिकाऱ्यांचा या खुर्चीवर डोळा राहत असल्याने कुरघोडीचे राजकारण, चढाओढ ही कायम राहते. एटीसी म्हणून या खुर्चीवर बसल्यास कधी ‘गेम’ होईल, हे सांगताच येत नाही. आदिवासी विकास विभाग म्हटला की भ्रष्टाचार, अपहार या दृष्टीनेच बघितले जात असल्याने एटीसी पदावर आयएएस दर्जाचे अधिकारी पाठ फिरवीत असल्याचे दिसून येते.आदिवासी विकास विभागाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड दूर झाल्याशिवाय आदिवासींचा विकास शक्य नाही, हेही खरे आहे. दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करून आदिवासींच्या राहणीमानात काहीही सुधारणा झाली नसून अधिकारी, कंत्राटदार गब्बर झाले आहेत.