शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अमरावतीत ट्रकचालकाने १२ वाहने उडविली, तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 21:27 IST

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती), दि.20 -  अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. या घटना चांदूरबाजार ते खरवाडी या सहा कि.मी. लांबीच्या मार्गावरील बुधवारी सायंकाळी घडल्या. मृतांमध्ये किशोर इंगळे (४०), शिल्पा किशोर इंगळे (३८, पत्नी), शौर्य किशोर इंगळे (६, मुलगा, सर्व रा. काकडीपुरा, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, कसबा येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. घटनेनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. विविध अपघातानंतर ट्रकचालक व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले दोन क्लिनरही जखमी आहेत. वृत्त लिहिस्तोवर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते. पोलिसांचा मोठा गराळा ट्रकभोवती होता. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्र. एम.पी. ०९/एच.एफ. १५४२ हा मोर्शी मार्गावरुन चांदूरबाजारमार्गे अमरावतीकडे जनावरे वाहून नेत होता. चांदूरबाजार येथे बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. ट्रक थांबविण्याऐवजी चालकाने तो भरधाव वेगाने दामटला. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने नेला जात होता. पळण्याच्या मानसिकतेतील चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने कारला जोरदार धडक दिली. कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरुन येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकांना धडक देत खरवाडीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. हा घटनाक्रम घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. खारवाडी गावात भ्रमणध्वनीवरुन ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये अडविण्याचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक गाठलाच. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले. नागरिकांचा संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घटनास्थळी पोलीस कुमकही पोहोचली. संतप्त नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांच्या हप्तेखोर वृत्तीमुळेच असे ट्रक निष्पापांचे बळी घेतात, असा संताप यावेळी नागरिक जाहीरपणे व्यक्त करीत होते.