शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

अमरावतीत ट्रकचालकाने १२ वाहने उडविली, तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 21:27 IST

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती), दि.20 -  अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. या घटना चांदूरबाजार ते खरवाडी या सहा कि.मी. लांबीच्या मार्गावरील बुधवारी सायंकाळी घडल्या. मृतांमध्ये किशोर इंगळे (४०), शिल्पा किशोर इंगळे (३८, पत्नी), शौर्य किशोर इंगळे (६, मुलगा, सर्व रा. काकडीपुरा, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, कसबा येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. घटनेनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. विविध अपघातानंतर ट्रकचालक व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले दोन क्लिनरही जखमी आहेत. वृत्त लिहिस्तोवर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते. पोलिसांचा मोठा गराळा ट्रकभोवती होता. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्र. एम.पी. ०९/एच.एफ. १५४२ हा मोर्शी मार्गावरुन चांदूरबाजारमार्गे अमरावतीकडे जनावरे वाहून नेत होता. चांदूरबाजार येथे बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. ट्रक थांबविण्याऐवजी चालकाने तो भरधाव वेगाने दामटला. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने नेला जात होता. पळण्याच्या मानसिकतेतील चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने कारला जोरदार धडक दिली. कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरुन येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकांना धडक देत खरवाडीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. हा घटनाक्रम घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. खारवाडी गावात भ्रमणध्वनीवरुन ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये अडविण्याचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक गाठलाच. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले. नागरिकांचा संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घटनास्थळी पोलीस कुमकही पोहोचली. संतप्त नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांच्या हप्तेखोर वृत्तीमुळेच असे ट्रक निष्पापांचे बळी घेतात, असा संताप यावेळी नागरिक जाहीरपणे व्यक्त करीत होते.