शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अमरावतीत ट्रकचालकाने १२ वाहने उडविली, तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 21:27 IST

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती), दि.20 -  अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. या घटना चांदूरबाजार ते खरवाडी या सहा कि.मी. लांबीच्या मार्गावरील बुधवारी सायंकाळी घडल्या. मृतांमध्ये किशोर इंगळे (४०), शिल्पा किशोर इंगळे (३८, पत्नी), शौर्य किशोर इंगळे (६, मुलगा, सर्व रा. काकडीपुरा, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, कसबा येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. घटनेनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. विविध अपघातानंतर ट्रकचालक व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले दोन क्लिनरही जखमी आहेत. वृत्त लिहिस्तोवर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते. पोलिसांचा मोठा गराळा ट्रकभोवती होता. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्र. एम.पी. ०९/एच.एफ. १५४२ हा मोर्शी मार्गावरुन चांदूरबाजारमार्गे अमरावतीकडे जनावरे वाहून नेत होता. चांदूरबाजार येथे बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. ट्रक थांबविण्याऐवजी चालकाने तो भरधाव वेगाने दामटला. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने नेला जात होता. पळण्याच्या मानसिकतेतील चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने कारला जोरदार धडक दिली. कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरुन येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकांना धडक देत खरवाडीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. हा घटनाक्रम घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. खारवाडी गावात भ्रमणध्वनीवरुन ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये अडविण्याचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक गाठलाच. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले. नागरिकांचा संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घटनास्थळी पोलीस कुमकही पोहोचली. संतप्त नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांच्या हप्तेखोर वृत्तीमुळेच असे ट्रक निष्पापांचे बळी घेतात, असा संताप यावेळी नागरिक जाहीरपणे व्यक्त करीत होते.