शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ट्रकचालकाने १२ वाहने उडविली, तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 21:27 IST

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती), दि.20 -  अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. या घटना चांदूरबाजार ते खरवाडी या सहा कि.मी. लांबीच्या मार्गावरील बुधवारी सायंकाळी घडल्या. मृतांमध्ये किशोर इंगळे (४०), शिल्पा किशोर इंगळे (३८, पत्नी), शौर्य किशोर इंगळे (६, मुलगा, सर्व रा. काकडीपुरा, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, कसबा येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. घटनेनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. विविध अपघातानंतर ट्रकचालक व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले दोन क्लिनरही जखमी आहेत. वृत्त लिहिस्तोवर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते. पोलिसांचा मोठा गराळा ट्रकभोवती होता. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्र. एम.पी. ०९/एच.एफ. १५४२ हा मोर्शी मार्गावरुन चांदूरबाजारमार्गे अमरावतीकडे जनावरे वाहून नेत होता. चांदूरबाजार येथे बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. ट्रक थांबविण्याऐवजी चालकाने तो भरधाव वेगाने दामटला. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने नेला जात होता. पळण्याच्या मानसिकतेतील चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने कारला जोरदार धडक दिली. कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरुन येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकांना धडक देत खरवाडीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. हा घटनाक्रम घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. खारवाडी गावात भ्रमणध्वनीवरुन ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये अडविण्याचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक गाठलाच. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले. नागरिकांचा संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घटनास्थळी पोलीस कुमकही पोहोचली. संतप्त नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांच्या हप्तेखोर वृत्तीमुळेच असे ट्रक निष्पापांचे बळी घेतात, असा संताप यावेळी नागरिक जाहीरपणे व्यक्त करीत होते.