यवतमाळ : पश्चिम विदर्भात थाटण्यात आलेल्या एमआयडीसींमध्ये दलालांचेच भूखंड अधिक असल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी दलालांच्याच इशाऱ्यावर धावत असल्याने दलाल म्हणतील त्यालाच भूखंड मिळत आहेत. आजच्या घडीला दलालांच्या आडोशाने बहुतांश बिअरबार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी हे भूखंड दडपले आहेत. राज्यात बहुतांश एमआयडीसीत हेच चित्र आहे. जुन्या एमआयडीसीतील उद्योग न थाटलेले भूखंड परत घेतल्याचे वातावरण तयार केले जात असले तरी प्रत्यक्षात आजही अनेकांजवळ आठ ते दहा वर्षांपासून उद्योगाशिवाय भूखंड पडून आहेत. दलालांमार्फत पैसे देईल त्यालाच भूखंड, असा निकष एमआयडीसीत लावला जात आहे.
अमरावती-मुंबईच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे
By admin | Updated: September 3, 2015 00:55 IST