शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अमोल मिटकरींना महायुतीतील नेत्यांवरही संशय?; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 21:51 IST

विजय शिवतारे यांच्याकडून अजित पवार यांच्यावर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला जात आहे. शिवतारे यांच्या या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amol Mitkari ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमदेवारीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विजय शिवतारे यांच्याकडून अजित पवारांवर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला जात आहे. शिवतारे यांच्या या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र शिवतारे यांच्यावर पलटवार करताना अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, "विजय शिवतारे ही विषारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे. एखादा दिवा विझण्याआधी फडफड करतो, त्याप्रमाणेच विजय शिवतारे यांचाही राजकीय अंत जवळ आला आहे, त्यामुळे त्यांची फडफड सुरू आहे. शिवतारे यांना कोणीही साथ द्यायला तयार नाही. वेळ आली तर बलिदान द्यायचं, पण स्वराज्य वाचवायचं, असा पुरंदरचा इतिहास आहे. मात्र विजय शिवतारे हे दिलेर खान म्हणून जन्माला आले आहेत. शिवतारे एवढे बोलत आहेत म्हणजे त्यांना कोणत्या तरी मोठ्या नेत्याची साथ आहे. तो नेता सत्तेतलाही असू शकतो आणि विरोधी पक्षातीलही असू शकतो," असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. तसंच शिवतारे आता पातळी सोडून बोलू लागले आहेत. त्यांच्या मागचं डोकं नक्की कोण आहे, ते शोधावं लागेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, "थोड्या-फार पैशांसाठी विजय शिवतारे हे आपली बार्गेनिंग पॉवर दाखवत आहेत. मात्र त्यांचं राजकीय आयुष्य हे लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यापर्यंतच आहे. निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची औकात दाखवून देऊ," असा इशाराही अमोल मिटकरींनी दिला आहे.

विजय शिवतारे यांनी आज काय घोषणा केली?

विजय शिवतारे यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असल्याचं सांगत आज थेट निवडणूक अर्ज भरण्याची तारीखही जाहीर केली आहे. "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. पुरंदरमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

"पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केला आहे. हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहेत. मी दोन्ही पवारांविषयी माझ्या सभांमध्ये बोलणार आहे. अजित पवारांनी अनेक लोकांना त्रास दिला आहे. सुप्रिया सुळेंनीही मागील १५ वर्षांत लोकांच्या हिताचं दोन टक्केही काम केलं नाही," असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला आहे. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीVijay Shivtareविजय शिवतारेbaramati-pcबारामती