शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:56 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमित यांनी काम सुरू केले आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अमित यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनावर जोर देण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना आणि मनसेच्या युवक आघाड्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा बीचवर सफाई मोहीम आखली होती. आता, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे स्थानिक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहे.

भाजप-शिवसेना युती अंतिम झाली असून विरोधकांची मात्र अद्याप चर्चाच सुरू आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्यातील या घडामोडीमुळे विधानसभा निवडणुकीला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांना सोबत घेण्यास राज्यातील नेत्यांनी असमर्थता दर्शविली होती. परंतु, राज यांच्या दिल्ली वारीने राज्यात नवीन समिकरणे उदयास येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेची युवक आघाडी सक्रिय होताना दिसत असून याचा पक्ष संघटनेला फायदाच होणार आहे.

गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा बीच साफ केल्यानंतर लगेचच अफरोज शाह यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी आदित्य यांच्यासोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते होते. आदित्य ठाकरे पर्यावरण आणि स्वच्छेतवर काम करत आहे. त्यांच्याच आग्रहामुळे राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आले होते. या व्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सक्रीय होऊन शिवसैनिकांशी संवाद साधला होता. आता आदित्य ठाकरे राज्यभर जनआशिर्वाद दौरा काढणार असल्याचे समजते. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

आदित्य यांचा कित्ता गिरवत आमित ठाकरे देखील स्थानिक प्रश्नांवर काम करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमित यांनी काम सुरू केले आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अमित यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरे ऐकूण अमित ठाकरे यांनी अक्षरश: डोकं टेकवले होते. या भेटीत आमित यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच रेल्वे अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला.

दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागामुळे ठाकरे घरण्यातील तिसरी पिढी जनतेत मिसळून काम करताना दिसत आहेत. याचा त्यांच्या पक्षांना किती फायदा होतो हे येणारा काळच सांगणार आहे.