शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

‘हम दो, हमारे दो’साठी घटनादुरुस्ती विधेयक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 05:00 IST

शिवसेना खासदार अनिल देसाईंचा पुढाकार; लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाला मर्यादा

नवी दिल्ली: देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी फक्त दोनपर्यंतच अपत्ये जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना करांमध्ये सवलत तसेच शिक्षण व नोकरीत प्राधान्य देऊन प्रोत्साहित करण्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत एक खासगी घटनादुरुस्ती विधेयक सादर केले आहे.

अशी खासगी विधेयके मंजूर होत नाहीत. मात्र त्या अनुषंगाने त्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन फार तर सरकार त्या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देते. घटनादुरुस्तीसाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक असल्याने खास करून असे खासगी विधेयक मंजूर होणे अशक्यप्रायच असते.अनिल देसाई यांनी राज्यघटनेत दुरुस्ती करून ४७ ए हा नवा अनुच्छेद समाविष्ट करण्यासाठी ही विधेयक मांडले आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकारने लहान कुटुंबाला प्रोत्साहन द्यावे व त्यासाठी अपत्यांची संख्या दोनपर्यंत मर्यादित ठेवणाऱ्यांना करात सवलत आणि नोकरी, शिक्षण व सामाजिक लाभांमध्ये प्राधान्य द्यावे तसेच याचे पालन न करणाºयांना या लाभांपासून वंचित करावे, असे त्यात म्हटले आहे.हे विधेयक मांडण्यामागची भूमिका स्पष्ट करताना खासदार देसाई म्हणतात की, मोठ्या लोकसंख्येने देशाच्या आर्थिक विकासावर मर्यादा येतात. नैसर्गिक साधनांवर ताण पडून पर्यावरणाचे संतुलनही बिघडते. गेल्या ४० वर्षांत भारताची लोकसंख्या दुपटीने वाढून १२५ कोटींच्या पार गेली आहे. सन २०५०पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकसंख्या आटोक्यात ठेवणे नितांत गरजेचे आहे.

मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावीखासदार देसाई यांनी ज्या अनुच्छेद ४७ मध्ये दुरुस्ती सुचविली आहे तो राज्यघटनेच्या चौथ्या खंडात आहे. या खंडात ३६ ते ५१ असे एकूण १६ अनुच्छेद आहेत व त्यांना ‘राज्यव्यवहाराची मार्गदर्शक तत्वे’ असे म्हटले जाते. यात दिलेले विषय हे नागरिकांचे मूलभूत हक्क नाही व त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. मात्र सरकारने कायदे करताना ही मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावी, अशी अपेक्षा आहे. समान नागरी कायदा हा विषय यातच आहे. पण सरकारने त्यासाठी अद्याप काही केलेले नाही. मात्र शिक्षणहक्क कायदा यानुसारच केला गेला आहे. त्यामुळे हे विधयक मंजूर होऊन घटनादुरुस्ती झाली तरी ‘हम दो, हमारे दो’साठी सरकारने प्रोत्साहन योजना राबवावीच, अशी सक्ती मात्र केली जाऊ शकणार नाही.

टॅग्स :lok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना