शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अमृततुल्य

By admin | Updated: April 30, 2017 02:43 IST

कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.

- भक्ती सोमण कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.उन्हाळ्यात हैराण झालेल्या देहाला पौष्टिक प्यायला मिळाले, तर सोनेपे सुहागाच. खरे तर उन्हाळा सुसह्य होईल, अशी एकसोएक पेये या काळात मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून तर या पेयांचे आपले असे वैशिष्ट्य आहे. पीयूषबाबत बोलायचे झाल्यास, कोणत्याही हंगामात पिता येणारे हे पेय आहे. काही पेये पिऊन जिवाला समाधान मिळते, तसेच दह्यापासून तयार केलेले हे पीयूष पिताना मिळते. दही, साखर, जायफळ किंवा वेलची आणि थोडंसे पाणी. हे तर घरात अगदी सहज उपलब्ध असते. बस याच चार गोष्टी एकमेकांत मिसळायच्या, झाले पीयूष तयार. ते पिताना दह्याच्या गोडव्याबरोबर जायफळाचा गंधही रोमारोमांत भिनतो. मात्र, ती तार जमण्यासाठी पीयूष तयार करण्याचे नेमके तंत्र जमावेच लागते. ते जमले की चव बदलणार नाही, ही खात्रीच. अशा या चविष्ट पीयूषविषयी अनेकांच्या मनात खास स्थान आहे. आजही गिरगावात गेले की, आम्ही मैत्रिणी हट्टाने पीयूष पितो. अमेरिकेत असलेल्या मैत्रिणीही आमच्यापेक्षा पीयूषचीच जास्त आठवण काढतात. विविध पेयांच्या भाऊगर्दीत आजही पीयूषविषयी वाटणारे ममत्व जरा जास्त आहे. आणि हे स्थान निर्माण करण्यात ‘प्रकाश’च्या पीयूषचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. किंबहुना, पीयूष म्हटले की, प्रकाश आणि प्रकाश म्हटले की पीयूषच डोळ्यांसमोर येते. गिरगाव आणि दादर या दोन्ही ठिकाणी असलेल्या प्रकाशच्या पीयूषच्या चवीत १९४६पासून यत्किंचितही बदल झालेला नाही. सध्या प्रकाशची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. पीयूषच्या चवीविषयी दादरच्या प्रकाश उपाहारगृहाचे मालक आशुतोष जोगळेकर म्हणाले, आमच्याकडे रोजच ताज्या दह्यापासून पीयूष तयार होते. त्यामुळे ते पिताना ताजेपणा मिळतो. गेली कित्येक वर्षं हा शिरस्ता पाळला जात असल्याचे जोगळेकर म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पीयूष लवकर संपवावे लागते. कारण ४-५ दिवस झाले, तर त्या पीयूषला आंबूूस वास यायला सुरुवात होऊन चवच बदलते. म्हणून ताजे पीयूषच नेहमी आपलेसे वाटते.आजकाल कोणत्याही पेयात काही ना काही टिष्ट्वस्ट करून ते पेश करण्याची पद्धत सुरू आहे. मात्र, पीयूषमध्ये असे काही बदल केल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे पीयूषचे स्थान हे विशेषच आहे, यात शंकाच नाही.पंजाबदी लस्सीउन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार लस्सी मनाला थंडावा देते. मलईयुक्त दह्यास घुसळून त्यात साखर घालून लस्सी करतात. दही आपण नेहमीच खातो, पण लस्सी करून प्यायल्याने त्यातील पोषक तत्त्वे अधिक प्रमाणात शरीराला मिळतात. पंजाब प्रांतात तर लस्सी रोज प्यायली जाते. किंबहुना, लस्सी म्हटले की, पंजाबच डोळ्यांसमोर येतो. मातीच्या छोट्या मडक्यात ताजे घट्ट दही, साखर आणि क्रीम एकत्र करून लस्सी पिण्यात खरी मजा आहे. या गोड लस्सीचे सध्या विविध प्रकार मिळत आहेत. दह्यात पुदिना, धने-जिरे पावडर एकत्र करून मिठी लस्सी केली जाते. याशिवाय दह्यात आंब्याचा रस, पिस्ता फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर असेही प्रकार लोकप्रिय आहेत. या लस्सीला ताकाप्रमाणेच स्मोकी फ्लेवर देता येऊ शकतो. अशी स्मोकी लस्सी एकदा तरी करून बघाच!