शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमृततुल्य

By admin | Updated: April 30, 2017 02:43 IST

कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.

- भक्ती सोमण कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.उन्हाळ्यात हैराण झालेल्या देहाला पौष्टिक प्यायला मिळाले, तर सोनेपे सुहागाच. खरे तर उन्हाळा सुसह्य होईल, अशी एकसोएक पेये या काळात मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून तर या पेयांचे आपले असे वैशिष्ट्य आहे. पीयूषबाबत बोलायचे झाल्यास, कोणत्याही हंगामात पिता येणारे हे पेय आहे. काही पेये पिऊन जिवाला समाधान मिळते, तसेच दह्यापासून तयार केलेले हे पीयूष पिताना मिळते. दही, साखर, जायफळ किंवा वेलची आणि थोडंसे पाणी. हे तर घरात अगदी सहज उपलब्ध असते. बस याच चार गोष्टी एकमेकांत मिसळायच्या, झाले पीयूष तयार. ते पिताना दह्याच्या गोडव्याबरोबर जायफळाचा गंधही रोमारोमांत भिनतो. मात्र, ती तार जमण्यासाठी पीयूष तयार करण्याचे नेमके तंत्र जमावेच लागते. ते जमले की चव बदलणार नाही, ही खात्रीच. अशा या चविष्ट पीयूषविषयी अनेकांच्या मनात खास स्थान आहे. आजही गिरगावात गेले की, आम्ही मैत्रिणी हट्टाने पीयूष पितो. अमेरिकेत असलेल्या मैत्रिणीही आमच्यापेक्षा पीयूषचीच जास्त आठवण काढतात. विविध पेयांच्या भाऊगर्दीत आजही पीयूषविषयी वाटणारे ममत्व जरा जास्त आहे. आणि हे स्थान निर्माण करण्यात ‘प्रकाश’च्या पीयूषचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. किंबहुना, पीयूष म्हटले की, प्रकाश आणि प्रकाश म्हटले की पीयूषच डोळ्यांसमोर येते. गिरगाव आणि दादर या दोन्ही ठिकाणी असलेल्या प्रकाशच्या पीयूषच्या चवीत १९४६पासून यत्किंचितही बदल झालेला नाही. सध्या प्रकाशची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. पीयूषच्या चवीविषयी दादरच्या प्रकाश उपाहारगृहाचे मालक आशुतोष जोगळेकर म्हणाले, आमच्याकडे रोजच ताज्या दह्यापासून पीयूष तयार होते. त्यामुळे ते पिताना ताजेपणा मिळतो. गेली कित्येक वर्षं हा शिरस्ता पाळला जात असल्याचे जोगळेकर म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पीयूष लवकर संपवावे लागते. कारण ४-५ दिवस झाले, तर त्या पीयूषला आंबूूस वास यायला सुरुवात होऊन चवच बदलते. म्हणून ताजे पीयूषच नेहमी आपलेसे वाटते.आजकाल कोणत्याही पेयात काही ना काही टिष्ट्वस्ट करून ते पेश करण्याची पद्धत सुरू आहे. मात्र, पीयूषमध्ये असे काही बदल केल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे पीयूषचे स्थान हे विशेषच आहे, यात शंकाच नाही.पंजाबदी लस्सीउन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार लस्सी मनाला थंडावा देते. मलईयुक्त दह्यास घुसळून त्यात साखर घालून लस्सी करतात. दही आपण नेहमीच खातो, पण लस्सी करून प्यायल्याने त्यातील पोषक तत्त्वे अधिक प्रमाणात शरीराला मिळतात. पंजाब प्रांतात तर लस्सी रोज प्यायली जाते. किंबहुना, लस्सी म्हटले की, पंजाबच डोळ्यांसमोर येतो. मातीच्या छोट्या मडक्यात ताजे घट्ट दही, साखर आणि क्रीम एकत्र करून लस्सी पिण्यात खरी मजा आहे. या गोड लस्सीचे सध्या विविध प्रकार मिळत आहेत. दह्यात पुदिना, धने-जिरे पावडर एकत्र करून मिठी लस्सी केली जाते. याशिवाय दह्यात आंब्याचा रस, पिस्ता फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर असेही प्रकार लोकप्रिय आहेत. या लस्सीला ताकाप्रमाणेच स्मोकी फ्लेवर देता येऊ शकतो. अशी स्मोकी लस्सी एकदा तरी करून बघाच!