शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा ‘ड्राय डे’!

By admin | Updated: November 30, 2014 01:36 IST

शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या मनोमीलनाचे नाटय़ अजूनही चर्चेच्या पहिल्या अंकातच रखडले आहे.

स्वामी आले नि गेले : खडसेंनी टाकला मिठाचा खडा
मुंबई : शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या मनोमीलनाचे नाटय़ अजूनही चर्चेच्या पहिल्या अंकातच रखडले आहे. भाजपाचे स्वयंभू नेते सुब्रrाण्यम स्वामी हे अगंतुक पाहुणो म्हणून ‘मातोश्री’वर पायधूळ झाडून आले, तर केवळ मंत्रिमंडळापुरता नाहीतर युतीचा दीर्घकालीन विचार करून फॉम्यरुला ठरवावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य सोडले तर दोन्ही पक्षांसाठी शनिवार तसा ‘ड्राय-डे’च ठरला! त्यातच शिवसेनेचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मिठाचा खडा टाकला.
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पण त्या चर्चेतून कोणतीही फलनिष्पत्ती न झाल्याने दोन्ही मंत्री रिकाम्या हातानेच मातोश्रीवरून परतले. काल अर्धवट राहिलेली चर्चा आज पुढे सुरू होईल, असे सांगितले जात असतानाच  ‘मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत भाजपाकडून  अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही,’ असे विधान शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रस्ताव आलेला नसताना मग काल दोन मंत्र्यांनी उद्धव यांच्याशी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली, हे कोणालाच कळू शकले नाही.
दरम्यान, सुब्रrाण्यम स्वामी यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी चर्चा केली. उभयतांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही, मात्र  हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना-भाजपाने एकत्र येणो आवश्यक असल्याचे मत स्वामी यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे स्वामी यांना शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी भाजपाने अधिकृतपणो पाठविलेले नव्हते. ती त्यांची वैयक्तिक भेट होती, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. 
त्यामुळे स्वामी कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी मातोश्रीवर गेले, हे आणखी एक गूढच आहे.  (विशेष प्रतिनिधी)
 
आगामी काळात होणा:या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकात युतीचा फॉम्र्युला काय असेल हेही ठरविणो आवश्यक आहे. शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे हीच आमची भूमिका आहे. मात्र, सरकारमध्ये एकत्र बसायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकमेकांवर टीका करीत फिरायचे असे आघाडी सरकारमध्ये घडत होते. आमच्यात ते होऊ नये यासाठी फॉम्यरुला ठरणो गरजेचे आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
विस्तार होणारच
राज्य मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केवळ 1क् मंत्र्यांच्या आधारे अधिवेशनाला सामोरे जाणो शक्य नाही. किमान 3क् मंत्री असायला हवेत, असे सांगून त्यांनी आगामी विस्तार मोठा असेल असे संकेत दिले. त्यात शिवसेना असेल का याबाबत, ‘आमचा तसा प्रयत्न आहे,’ असे सांगून त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. 
 
सहकारमंत्र्यांची चुप्पी!
वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना-भाजपाच्या चर्चेबाबत जाहीर वक्तव्य करू नये अशा स्पष्ट सूचना असल्याने आपण त्यावर काही बोलणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले.