शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

युतीचा ‘ड्राय डे’!

By admin | Updated: November 30, 2014 01:36 IST

शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या मनोमीलनाचे नाटय़ अजूनही चर्चेच्या पहिल्या अंकातच रखडले आहे.

स्वामी आले नि गेले : खडसेंनी टाकला मिठाचा खडा
मुंबई : शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या मनोमीलनाचे नाटय़ अजूनही चर्चेच्या पहिल्या अंकातच रखडले आहे. भाजपाचे स्वयंभू नेते सुब्रrाण्यम स्वामी हे अगंतुक पाहुणो म्हणून ‘मातोश्री’वर पायधूळ झाडून आले, तर केवळ मंत्रिमंडळापुरता नाहीतर युतीचा दीर्घकालीन विचार करून फॉम्यरुला ठरवावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य सोडले तर दोन्ही पक्षांसाठी शनिवार तसा ‘ड्राय-डे’च ठरला! त्यातच शिवसेनेचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मिठाचा खडा टाकला.
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पण त्या चर्चेतून कोणतीही फलनिष्पत्ती न झाल्याने दोन्ही मंत्री रिकाम्या हातानेच मातोश्रीवरून परतले. काल अर्धवट राहिलेली चर्चा आज पुढे सुरू होईल, असे सांगितले जात असतानाच  ‘मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत भाजपाकडून  अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही,’ असे विधान शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रस्ताव आलेला नसताना मग काल दोन मंत्र्यांनी उद्धव यांच्याशी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली, हे कोणालाच कळू शकले नाही.
दरम्यान, सुब्रrाण्यम स्वामी यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी चर्चा केली. उभयतांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही, मात्र  हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना-भाजपाने एकत्र येणो आवश्यक असल्याचे मत स्वामी यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे स्वामी यांना शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी भाजपाने अधिकृतपणो पाठविलेले नव्हते. ती त्यांची वैयक्तिक भेट होती, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. 
त्यामुळे स्वामी कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी मातोश्रीवर गेले, हे आणखी एक गूढच आहे.  (विशेष प्रतिनिधी)
 
आगामी काळात होणा:या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकात युतीचा फॉम्र्युला काय असेल हेही ठरविणो आवश्यक आहे. शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे हीच आमची भूमिका आहे. मात्र, सरकारमध्ये एकत्र बसायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकमेकांवर टीका करीत फिरायचे असे आघाडी सरकारमध्ये घडत होते. आमच्यात ते होऊ नये यासाठी फॉम्यरुला ठरणो गरजेचे आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
विस्तार होणारच
राज्य मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केवळ 1क् मंत्र्यांच्या आधारे अधिवेशनाला सामोरे जाणो शक्य नाही. किमान 3क् मंत्री असायला हवेत, असे सांगून त्यांनी आगामी विस्तार मोठा असेल असे संकेत दिले. त्यात शिवसेना असेल का याबाबत, ‘आमचा तसा प्रयत्न आहे,’ असे सांगून त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. 
 
सहकारमंत्र्यांची चुप्पी!
वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना-भाजपाच्या चर्चेबाबत जाहीर वक्तव्य करू नये अशा स्पष्ट सूचना असल्याने आपण त्यावर काही बोलणार नाही, असे सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी कोल्हापुरात सांगितले.