शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीतही राहणार युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:44 IST

मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही

मुंबई : ‘आमची युती विधानसभा निवडणुकीपर्यंतच नाही तर त्या पुढील निवडणुकांतही कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांचे अभिनंदन केले. यावेळी मातोश्रीबाहेर प्रचंड विजयी जल्लोष सुरू होता.

जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि युतीच्या ऐक्याचा विजय आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मातोश्रीवर आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतल्यासारखे वाटत आहे. आज गोपीनाथ मुंडेंचीही आठवण होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्याकाळात काही चुका घडल्या, युतीतील संबंध काहीवेळा ताणले गेले, जे घडले ते दुर्दैवी होते पण त्यातून आम्ही आता शिकलो आहोत. यानंतरच्या सर्व निवडणुकांना आम्ही एकदिलाने सामोरे जावू.

विरोधी पक्षांनी मोदी व भाजपची निंदा करण्यातच वेळ घालवला. आम्ही विकासाचा, समस्यांवर मात करण्याचा अजेंडा त्यांना दिला. मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला. आता विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. २ दिवस जल्लोष करु पण राज्यासमोरील दुष्काळाचा सामना करण्याचे आव्हान मोठे आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.ते माझे मोठे भाऊ, त्यांचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी युतीमध्ये आता मोठा भाऊ कोण या पत्रकारांच्या प्रश्नात, ‘तुम्ही त्यात पडू नका, आमचे आम्ही पाहू’असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. हजरजबाबी मुख्यमंत्री लगेच म्हणाले, उद्धवजी माझे मोठे भाऊ आहेत आणि मोदीजी त्यांचे मोठे भाऊ आहेत’. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी खास कविता सादर केली.

आधी पक्ष कार्यालय मग मातोश्रीराजकीय कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासून ज्या पक्षाची अत्यंत निष्ठेने सेवा केली त्या भाजपच्या विजयाने अत्यंत उत्साहित झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून निघून पहिले गाठले ते भाजपचे कार्यालय. तेथील विजयाच्या जल्लोषात ते सहभागी झाले. तेथून ते उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांचे तंतोतंत भाकीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात जे जे भाकित व्यक्त केले ते ते तंतोतंत खरे ठरले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ४० हून अधिक जागा जिंकेलच, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी तब्बल ७५ हून अधिक सभा घेत राज्य ढवळून काढले होते. प्रचाराचे प्रभावी नियोजन केले. लोकमतशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात ५५ हून अधिक, पश्चिम बंगालमध्ये १५ हून अधिक, बिहारमध्ये ३५ हून अधिक तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एखाददोन अपवाद वगळता सर्व जागा भाजप/एनडीए जिंकेल असे ठामपणे सांगितले होते. तेही शंभर टक्के खरे ठरले आहे.

लावा रे ते फटाके...मुंबईसह महाराष्ट्रात मराठी मते फोडण्याचा प्रयत्न झाला याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, मला त्यावर काही बोलायचे नाही. आजचा दिवस विरोधकांवर बोलण्याचा नाही. मी फक्त एवढेच म्हणेन, ‘लावा रे ते फटाके’. राज ठाकरे यांच्या ‘लावा रे तो व्हीडीओ’ची त्यांनी अशी खिल्ली उडविली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस