शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

विधानसभा निवडणुकीतही राहणार युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:44 IST

मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही

मुंबई : ‘आमची युती विधानसभा निवडणुकीपर्यंतच नाही तर त्या पुढील निवडणुकांतही कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांचे अभिनंदन केले. यावेळी मातोश्रीबाहेर प्रचंड विजयी जल्लोष सुरू होता.

जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि युतीच्या ऐक्याचा विजय आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मातोश्रीवर आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतल्यासारखे वाटत आहे. आज गोपीनाथ मुंडेंचीही आठवण होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्याकाळात काही चुका घडल्या, युतीतील संबंध काहीवेळा ताणले गेले, जे घडले ते दुर्दैवी होते पण त्यातून आम्ही आता शिकलो आहोत. यानंतरच्या सर्व निवडणुकांना आम्ही एकदिलाने सामोरे जावू.

विरोधी पक्षांनी मोदी व भाजपची निंदा करण्यातच वेळ घालवला. आम्ही विकासाचा, समस्यांवर मात करण्याचा अजेंडा त्यांना दिला. मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला. आता विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. २ दिवस जल्लोष करु पण राज्यासमोरील दुष्काळाचा सामना करण्याचे आव्हान मोठे आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.ते माझे मोठे भाऊ, त्यांचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी युतीमध्ये आता मोठा भाऊ कोण या पत्रकारांच्या प्रश्नात, ‘तुम्ही त्यात पडू नका, आमचे आम्ही पाहू’असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. हजरजबाबी मुख्यमंत्री लगेच म्हणाले, उद्धवजी माझे मोठे भाऊ आहेत आणि मोदीजी त्यांचे मोठे भाऊ आहेत’. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी खास कविता सादर केली.

आधी पक्ष कार्यालय मग मातोश्रीराजकीय कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासून ज्या पक्षाची अत्यंत निष्ठेने सेवा केली त्या भाजपच्या विजयाने अत्यंत उत्साहित झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून निघून पहिले गाठले ते भाजपचे कार्यालय. तेथील विजयाच्या जल्लोषात ते सहभागी झाले. तेथून ते उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांचे तंतोतंत भाकीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात जे जे भाकित व्यक्त केले ते ते तंतोतंत खरे ठरले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ४० हून अधिक जागा जिंकेलच, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी तब्बल ७५ हून अधिक सभा घेत राज्य ढवळून काढले होते. प्रचाराचे प्रभावी नियोजन केले. लोकमतशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात ५५ हून अधिक, पश्चिम बंगालमध्ये १५ हून अधिक, बिहारमध्ये ३५ हून अधिक तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एखाददोन अपवाद वगळता सर्व जागा भाजप/एनडीए जिंकेल असे ठामपणे सांगितले होते. तेही शंभर टक्के खरे ठरले आहे.

लावा रे ते फटाके...मुंबईसह महाराष्ट्रात मराठी मते फोडण्याचा प्रयत्न झाला याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, मला त्यावर काही बोलायचे नाही. आजचा दिवस विरोधकांवर बोलण्याचा नाही. मी फक्त एवढेच म्हणेन, ‘लावा रे ते फटाके’. राज ठाकरे यांच्या ‘लावा रे तो व्हीडीओ’ची त्यांनी अशी खिल्ली उडविली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस