शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

महापालिका निवडणुकांसाठी युती; दानवे यांची घोषणा

By admin | Updated: March 26, 2015 01:49 IST

औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

मुंबई : विधानसभा निवडणूक परस्परांविरुद्ध लढणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पार्टीने औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दोन्ही महापालिका निवडणुकीत युती करण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार आज दानवे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांना भाजपाचा पाठिंबा असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असून नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याकरिता निवडणुकीत युती होणे ही दोन्ही पक्षांची गरज आहे. मात्र जागावाटप हा युती आकाराला येण्यातील मुख्य अडसर असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते खासगीत मान्य करीत आहेत. भाजपा-शिवसेनेतील वरचेवर होणाऱ्या वादाबाबत विचारले असता दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांचा मोठा संसार आहे. जेथे दोन लोक राहतात तेथे सुरुवातीला काही ना काही होत असते. मात्र युतीत सर्व काही आलबेल आहे. (विशेष प्रतिनिधी)