शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:27 IST

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पुन्हा महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र असे असलेही तरीही, दीड महिन्यांचा कालवधी उरला असतानाही दोन्ही पक्षातील जागावाटपाचा निर्णय अजूनही होऊ शकला नाही. त्यामुळे मित्र पक्षांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. जर भाजप- सेना सोबत लढली तर निश्चितच याचा फायदा मित्र पक्षांच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत. मात्र कुणाला किती जागा द्यायच्या या बाबतचा खुलासा अजूनही होऊ शकला नाही. मात्र रासप प्रमुख आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी किमान १४ जागा आपल्याला सोडाव्यात अशी मागणी केली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा १० जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १२ तर आमदार विनायक मेटे यांनी सुद्धा १२ जागा देण्याची मागणी केली आहे.

भाजप-शिवसेनेत एकीकडे युतीची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते आमची स्वबळाची तयारी सुद्धा झाली असल्याचे वक्तव्य करत असल्याने ऐनवेळी युती फिसकटली जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र युती जर फिसकटली तर याचा फटका मित्र पक्षांना सुद्धा बसण्याची शक्यता असल्याने, मित्र पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. जर युती झाली तर निश्चितच याचा फायदा सुद्धा मित्र पक्षाच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे युती व्हावीच अशी अशा मित्र पक्षांच्या नेत्यांना लागली आहे.