शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

युती अधांतरीच ! युती नको भाजपात सूर

By admin | Updated: January 13, 2017 05:13 IST

‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे

मुंबई/ठाणे : ‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे तितक्याच औत्सुकतेने विचारला जात आहे. गंमत अशी की, ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे, तीच मंडळी एकमेकांना हा प्रश्न विचारताना दिसत आहे! शिवसेना मुंबईच्या महापौरपदावर ठाम आहे. त्यामुळे राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांचा बिगुल वाजून ४८ तास उलटले तरी युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांकरिता शिवसेनेसोबत युती करण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये युतीच्या कुबड्या हव्या कशाला? अशी तीव्र भावना आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या प्रवेशद्वाराबाहेर लागलेल्या फलकांपासून व्यासपीठामागे लावलेल्या बॅनरपर्यंत आणि काही पदाधिकाऱ्यांच्या भाषणांतून स्वबळाचा नारा देण्याकरिता कार्यकर्ते किती आसुसलेले आहेत, याचेच प्रत्यंतर आले.प्रदीर्घ काळानंतर कार्यकारिणीची बैठक ठाण्यात झाली. प्रदेश कार्यकारिणीपूर्वी ठाण्याची जिल्हा कार्यकारिणी बैठक झाली. त्यातही स्वबळावर निवडणूक लढण्याचाच ठराव मंजूर केला गेला. या वेळी बोलताना शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मोकळेपणाने लढण्याची संधी दिली तर ताकद दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. लेले यांचाच सूर पक्षाचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत लावला. शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडलेल्या राजकीय ठरावात केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला गेला. याच ठरावावर बोलताना चव्हाण यांनी आता सरकारच्या या यशात आम्हाला कुणीही वाटेकरी नको आहे. व्यासपीठाच्या मागील बाजूला ‘सारा महाराष्ट्र जिंकू या’, असा बॅनर लावला होता. त्याच्याकडे बोट दाखवत चव्हाण म्हणाले की, आपल्याला सारा महाराष्ट्र जिंकायचा आहे, अर्धा नाही. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत तीन पायांची शर्यत संपवा, असे सांगत युती तोडण्याची भाषा केली होती.भाजपाच्या अनेक नेत्यांना युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, युती करताना पहिली चर्चा ही जागावाटपावर होते. त्यानंतर, काही विशिष्ट जागांवर होते.  विधानसभा निवडणुकीत भाजपाची वाढलेली ताकद पाहता आम्ही निम्म्या जागांच्या खाली जागा घेणार नाही आणि शिवसेना तेवढ्या जागा सोडायला तयार होण्याची शक्यता नाही.  शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने युतीचे जागावाटप तत्पूर्वी होणे कठीण आहे.  मात्र, भाजपाला युती नको, हा संदेश जाऊ नये, याकरिता आम्ही चर्चेची तयारी दाखवली आहे. अर्थात, ज्या जिल्हा परिषदांच्या क्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहेत, अशा ठिकाणी युती होईल, असे संकेत त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)बॅनर्सचा बोलबालाया बैठकीच्या ठिकाणी रस्त्यावर  ‘युती नको, विकास हवा’, ‘ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा’, ‘मोदी-फडणवीसांचा कारभार ठरला राज्यात नंबर वन, नको कुबडी युतीची, करा तयारी एकहाती विजयाची’... असा निर्धार व्यक्त करणारे बॅनर सकाळपासून लागले होते. बैठकीला येणारे नेते व पदाधिकारी क्षणभर थांबून हे बॅनर्स वाचत होते. हे बॅनर्स भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे नेते खासगीत मान्य करीत होते.