शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

युती अधांतरीच ! युती नको भाजपात सूर

By admin | Updated: January 13, 2017 05:13 IST

‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे

मुंबई/ठाणे : ‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे तितक्याच औत्सुकतेने विचारला जात आहे. गंमत अशी की, ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे, तीच मंडळी एकमेकांना हा प्रश्न विचारताना दिसत आहे! शिवसेना मुंबईच्या महापौरपदावर ठाम आहे. त्यामुळे राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांचा बिगुल वाजून ४८ तास उलटले तरी युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांकरिता शिवसेनेसोबत युती करण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये युतीच्या कुबड्या हव्या कशाला? अशी तीव्र भावना आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या प्रवेशद्वाराबाहेर लागलेल्या फलकांपासून व्यासपीठामागे लावलेल्या बॅनरपर्यंत आणि काही पदाधिकाऱ्यांच्या भाषणांतून स्वबळाचा नारा देण्याकरिता कार्यकर्ते किती आसुसलेले आहेत, याचेच प्रत्यंतर आले.प्रदीर्घ काळानंतर कार्यकारिणीची बैठक ठाण्यात झाली. प्रदेश कार्यकारिणीपूर्वी ठाण्याची जिल्हा कार्यकारिणी बैठक झाली. त्यातही स्वबळावर निवडणूक लढण्याचाच ठराव मंजूर केला गेला. या वेळी बोलताना शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मोकळेपणाने लढण्याची संधी दिली तर ताकद दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. लेले यांचाच सूर पक्षाचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत लावला. शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडलेल्या राजकीय ठरावात केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला गेला. याच ठरावावर बोलताना चव्हाण यांनी आता सरकारच्या या यशात आम्हाला कुणीही वाटेकरी नको आहे. व्यासपीठाच्या मागील बाजूला ‘सारा महाराष्ट्र जिंकू या’, असा बॅनर लावला होता. त्याच्याकडे बोट दाखवत चव्हाण म्हणाले की, आपल्याला सारा महाराष्ट्र जिंकायचा आहे, अर्धा नाही. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत तीन पायांची शर्यत संपवा, असे सांगत युती तोडण्याची भाषा केली होती.भाजपाच्या अनेक नेत्यांना युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, युती करताना पहिली चर्चा ही जागावाटपावर होते. त्यानंतर, काही विशिष्ट जागांवर होते.  विधानसभा निवडणुकीत भाजपाची वाढलेली ताकद पाहता आम्ही निम्म्या जागांच्या खाली जागा घेणार नाही आणि शिवसेना तेवढ्या जागा सोडायला तयार होण्याची शक्यता नाही.  शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने युतीचे जागावाटप तत्पूर्वी होणे कठीण आहे.  मात्र, भाजपाला युती नको, हा संदेश जाऊ नये, याकरिता आम्ही चर्चेची तयारी दाखवली आहे. अर्थात, ज्या जिल्हा परिषदांच्या क्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहेत, अशा ठिकाणी युती होईल, असे संकेत त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)बॅनर्सचा बोलबालाया बैठकीच्या ठिकाणी रस्त्यावर  ‘युती नको, विकास हवा’, ‘ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा’, ‘मोदी-फडणवीसांचा कारभार ठरला राज्यात नंबर वन, नको कुबडी युतीची, करा तयारी एकहाती विजयाची’... असा निर्धार व्यक्त करणारे बॅनर सकाळपासून लागले होते. बैठकीला येणारे नेते व पदाधिकारी क्षणभर थांबून हे बॅनर्स वाचत होते. हे बॅनर्स भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे नेते खासगीत मान्य करीत होते.