शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अकोला महापालिकेवर युतीचा झेंडा

By admin | Updated: September 10, 2014 19:59 IST

भाजपच्या उज्वला देशमुख महापौर; उपमहापौरपदी शिवसेनेचे विनोद मापारी.

अकोला- अकोला महापालिकेच्या सहाव्या महापौर म्हणून बुधवारी भाजपच्या उज्वला देशमुख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे युवा नगरसेवक विनोद मापारी यांची निवड झाली. सुरुवातीची अडीच वर्षे सत्तेत असलेल्या भारिप-बमसंने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, तर काँग्रेस सदस्यांनी अर्ज छाननीनंतर सभागृहातून बहिर्गमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याने युतीला साडेसात वर्षानंतर महापालिकेची सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली. फेब्रुवारी २0१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, काँग्रेसने भारिप-बमसंला महापौरपदासाठी पाठिंबा देऊन सत्ता मिळविली होती. भारिप-बमसंच्या ज्योत्स्ना गवई यांची महापौरपदी निवड झाली. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपल्याने, बुधवारी पुढील अडीच वर्षांसाठी निवडणूक घेण्यात आली. मनपा सभागृहात सकाळी १0 वाजता पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांनी विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. सर्वधारण महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी भाजपच्या उज्वला देशमुख, अपक्ष नगरसेविका हाजरा बी अब्दुल रशिद यांच्यासह काँग्रेसच्या पाच उमेदवारांचे अर्ज होते. सभेसाठी भारिप-बमसंचे बबलू जगताप आणि वैशाली मानवटकर हे दोघे वगळता सर्व सदस्य अनुपस्थित होते. १३ सदस्य अनुपस्थित असल्याने सभागृहात एकूण ६0 सदस्यांची उपस्थिती होती. अर्ज छाननीनंतर काँग्रेसच्या १३ सदस्यांनी सभागृहातून बर्हिगमन केले. त्यानंतर पार पडलेल्या म तदान प्रक्रियेत ४७ सदस्यांनी सहभाग घेतला. भाजपच्या उज्वला देशमुख यांनी ३७ मतं घेऊन विजय मिळविला. त्यांना भाजपचे १८, शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तसेच भारिप- बमसंच्या एका सदस्यासह ७ सर्मथित अपक्षांची मतं मिळाली. अपक्ष उमेदवार हाजरा बी यांना ८ मतं मिळाली. एका नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे विनोद मापारी आणि समाजवादी पार्टीचे नकीर खान यांनी अर्ज भरला होता. मापारी यांना मनसेचे राजेश काळे यांचे अतिरिक्त मत मिळून, एकूण ३८ मतं मिळाली. नकीर खान यांना ८ मतं मिळाली. काळे एका हत्या प्रकरणात कारागृहात असल्याने न्यायालयाच्या परवानगीने ते निवडणुकीसाठी सभागृहात आले होते. ते महापौर पदासाठी झालेल्या मतदानाच्यावेळी उपस्थित राहू शकले नाही; मात्र उ पमहापौर पदासाठी त्यांनी शिवसेनेला मतदान केले. भारिप- बमसंने काँग्रेसला पाठिंबा नाकारून, सभागृहात उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य फुटल्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा मनपात सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.