शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

अकोला महापालिकेवर युतीचा झेंडा

By admin | Updated: September 10, 2014 19:59 IST

भाजपच्या उज्वला देशमुख महापौर; उपमहापौरपदी शिवसेनेचे विनोद मापारी.

अकोला- अकोला महापालिकेच्या सहाव्या महापौर म्हणून बुधवारी भाजपच्या उज्वला देशमुख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे युवा नगरसेवक विनोद मापारी यांची निवड झाली. सुरुवातीची अडीच वर्षे सत्तेत असलेल्या भारिप-बमसंने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, तर काँग्रेस सदस्यांनी अर्ज छाननीनंतर सभागृहातून बहिर्गमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याने युतीला साडेसात वर्षानंतर महापालिकेची सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली. फेब्रुवारी २0१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, काँग्रेसने भारिप-बमसंला महापौरपदासाठी पाठिंबा देऊन सत्ता मिळविली होती. भारिप-बमसंच्या ज्योत्स्ना गवई यांची महापौरपदी निवड झाली. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपल्याने, बुधवारी पुढील अडीच वर्षांसाठी निवडणूक घेण्यात आली. मनपा सभागृहात सकाळी १0 वाजता पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांनी विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. सर्वधारण महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी भाजपच्या उज्वला देशमुख, अपक्ष नगरसेविका हाजरा बी अब्दुल रशिद यांच्यासह काँग्रेसच्या पाच उमेदवारांचे अर्ज होते. सभेसाठी भारिप-बमसंचे बबलू जगताप आणि वैशाली मानवटकर हे दोघे वगळता सर्व सदस्य अनुपस्थित होते. १३ सदस्य अनुपस्थित असल्याने सभागृहात एकूण ६0 सदस्यांची उपस्थिती होती. अर्ज छाननीनंतर काँग्रेसच्या १३ सदस्यांनी सभागृहातून बर्हिगमन केले. त्यानंतर पार पडलेल्या म तदान प्रक्रियेत ४७ सदस्यांनी सहभाग घेतला. भाजपच्या उज्वला देशमुख यांनी ३७ मतं घेऊन विजय मिळविला. त्यांना भाजपचे १८, शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तसेच भारिप- बमसंच्या एका सदस्यासह ७ सर्मथित अपक्षांची मतं मिळाली. अपक्ष उमेदवार हाजरा बी यांना ८ मतं मिळाली. एका नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे विनोद मापारी आणि समाजवादी पार्टीचे नकीर खान यांनी अर्ज भरला होता. मापारी यांना मनसेचे राजेश काळे यांचे अतिरिक्त मत मिळून, एकूण ३८ मतं मिळाली. नकीर खान यांना ८ मतं मिळाली. काळे एका हत्या प्रकरणात कारागृहात असल्याने न्यायालयाच्या परवानगीने ते निवडणुकीसाठी सभागृहात आले होते. ते महापौर पदासाठी झालेल्या मतदानाच्यावेळी उपस्थित राहू शकले नाही; मात्र उ पमहापौर पदासाठी त्यांनी शिवसेनेला मतदान केले. भारिप- बमसंने काँग्रेसला पाठिंबा नाकारून, सभागृहात उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य फुटल्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा मनपात सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.