शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

अकोला महापालिकेवर युतीचा झेंडा

By admin | Updated: September 10, 2014 19:59 IST

भाजपच्या उज्वला देशमुख महापौर; उपमहापौरपदी शिवसेनेचे विनोद मापारी.

अकोला- अकोला महापालिकेच्या सहाव्या महापौर म्हणून बुधवारी भाजपच्या उज्वला देशमुख यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे युवा नगरसेवक विनोद मापारी यांची निवड झाली. सुरुवातीची अडीच वर्षे सत्तेत असलेल्या भारिप-बमसंने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, तर काँग्रेस सदस्यांनी अर्ज छाननीनंतर सभागृहातून बहिर्गमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केल्याने युतीला साडेसात वर्षानंतर महापालिकेची सत्ता काबीज करण्याची संधी मिळाली. फेब्रुवारी २0१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, काँग्रेसने भारिप-बमसंला महापौरपदासाठी पाठिंबा देऊन सत्ता मिळविली होती. भारिप-बमसंच्या ज्योत्स्ना गवई यांची महापौरपदी निवड झाली. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपल्याने, बुधवारी पुढील अडीच वर्षांसाठी निवडणूक घेण्यात आली. मनपा सभागृहात सकाळी १0 वाजता पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांनी विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. सर्वधारण महिला संवर्गासाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी भाजपच्या उज्वला देशमुख, अपक्ष नगरसेविका हाजरा बी अब्दुल रशिद यांच्यासह काँग्रेसच्या पाच उमेदवारांचे अर्ज होते. सभेसाठी भारिप-बमसंचे बबलू जगताप आणि वैशाली मानवटकर हे दोघे वगळता सर्व सदस्य अनुपस्थित होते. १३ सदस्य अनुपस्थित असल्याने सभागृहात एकूण ६0 सदस्यांची उपस्थिती होती. अर्ज छाननीनंतर काँग्रेसच्या १३ सदस्यांनी सभागृहातून बर्हिगमन केले. त्यानंतर पार पडलेल्या म तदान प्रक्रियेत ४७ सदस्यांनी सहभाग घेतला. भाजपच्या उज्वला देशमुख यांनी ३७ मतं घेऊन विजय मिळविला. त्यांना भाजपचे १८, शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तसेच भारिप- बमसंच्या एका सदस्यासह ७ सर्मथित अपक्षांची मतं मिळाली. अपक्ष उमेदवार हाजरा बी यांना ८ मतं मिळाली. एका नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे विनोद मापारी आणि समाजवादी पार्टीचे नकीर खान यांनी अर्ज भरला होता. मापारी यांना मनसेचे राजेश काळे यांचे अतिरिक्त मत मिळून, एकूण ३८ मतं मिळाली. नकीर खान यांना ८ मतं मिळाली. काळे एका हत्या प्रकरणात कारागृहात असल्याने न्यायालयाच्या परवानगीने ते निवडणुकीसाठी सभागृहात आले होते. ते महापौर पदासाठी झालेल्या मतदानाच्यावेळी उपस्थित राहू शकले नाही; मात्र उ पमहापौर पदासाठी त्यांनी शिवसेनेला मतदान केले. भारिप- बमसंने काँग्रेसला पाठिंबा नाकारून, सभागृहात उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य फुटल्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा मनपात सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.