शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:38 IST

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला.

 जालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.इंग्लडस्थित भारतीयाचा मलबारहिल येथील बंगला खरेदी केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्यपाल विद्यासागर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचेजालना जिल्हा काँग्रेसचेअध्यक्ष जेथलिया यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तीन वर्षांत लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्राने कार्यकर्त्यांच्या नावावर जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली असल्याचा आरोप थेथलिया यांनी केला. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाºयांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगल्या अधिकाºयांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली.लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून याविरोधात आवाज उठविणाºयास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले.आरोप राजकीय द्वेषातूनमतदारसंघात होत असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांना त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशापोटी ते खोटे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मलबार हिल डी वॉर्ड,मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचाकाहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा हा प्रयत्नअसून याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे, असे लोणीकर म्हणाले.पालकमंत्र्यांचे गाव हागणदारीमुक्तीपासून दूरचकेवळ अट्टहास म्हणून जालना जिल्हा हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आला. वास्तविक पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे गाव अद्याप हागणदारीमुक्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात काय चित्र आसेल याची कल्पनाच केलेली बरी.स्वच्छ भारत अभियानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कुठलीही कामे दर्जेदार होत नसल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप जेथलिया यांनी केला.

टॅग्स :GovernmentसरकारCorruptionभ्रष्टाचार