शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:38 IST

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला.

 जालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.इंग्लडस्थित भारतीयाचा मलबारहिल येथील बंगला खरेदी केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्यपाल विद्यासागर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचेजालना जिल्हा काँग्रेसचेअध्यक्ष जेथलिया यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तीन वर्षांत लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्राने कार्यकर्त्यांच्या नावावर जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली असल्याचा आरोप थेथलिया यांनी केला. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाºयांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगल्या अधिकाºयांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली.लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून याविरोधात आवाज उठविणाºयास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले.आरोप राजकीय द्वेषातूनमतदारसंघात होत असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांना त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशापोटी ते खोटे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मलबार हिल डी वॉर्ड,मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचाकाहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा हा प्रयत्नअसून याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे, असे लोणीकर म्हणाले.पालकमंत्र्यांचे गाव हागणदारीमुक्तीपासून दूरचकेवळ अट्टहास म्हणून जालना जिल्हा हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आला. वास्तविक पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे गाव अद्याप हागणदारीमुक्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात काय चित्र आसेल याची कल्पनाच केलेली बरी.स्वच्छ भारत अभियानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कुठलीही कामे दर्जेदार होत नसल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप जेथलिया यांनी केला.

टॅग्स :GovernmentसरकारCorruptionभ्रष्टाचार