शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

एकत्रित प्रयत्नांतूनच होईल सर्वांगीण विकास

By admin | Updated: September 15, 2015 01:43 IST

विविध स्थानिक संस्थांचे योग्य नियोजन हा जगभरातील एक मोठा प्रश्न आहे. या नियोजनातूनच विकासाचे शिखर सहजपणे गाठता येते. सुशासन देणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी

नागपूर : विविध स्थानिक संस्थांचे योग्य नियोजन हा जगभरातील एक मोठा प्रश्न आहे. या नियोजनातूनच विकासाचे शिखर सहजपणे गाठता येते. सुशासन देणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर नागरिकांचादेखील त्यात उत्स्फूर्त सहभाग हवा. अशा प्रकारच्या एकत्रित प्रयत्नांतूनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. या वेळी राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.विद्यासागर राव होते. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी गौरव गं्रथाचे प्रकाशन राज्यपाल राव यांच्या हस्ते झाले.राष्ट्रपती म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये शहरीकरणाची प्रक्रिया अनेक दशके किंवा शतके चालली. औद्योगिक क्रांतीचीदेखील त्यांना मदत मिळाली. परंतु आपल्या देशाला त्या मानाने फारच कमी वेळ मिळाला. त्यामुळे शहरीकरणासोबत विकासाचा वेग वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे व त्यासाठी एकत्रित प्रयत्नच करावे लागणार आहेत. खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे यांसह विविध मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.नागपूरला करायचेय ‘रोल मॉडेल’- नागपूरला ‘मिनी’ भारताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराची ओळख संत्रानगरी, हिरवेगार शहर अशी आहे. आता देशातील शैक्षणिक ‘हब’ व उद्योगांचे शहर अशी नवीन ओळख प्रस्थापित करायची आहे. हे शहर देशासाठी ‘रोल मॉडेल’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.